शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

अडथळ्यांची शर्यत; प्रकल्प अहवालाचे काम रखडले

By admin | Updated: November 14, 2015 00:54 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद स्मार्ट सिटीचा प्रकल्प अहवाल सादर करण्याची मुदत अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे; परंतु मनपाने विकासासाठी कोणते मॉडेल स्वीकारायचे हेच अद्याप निश्चित केलेले नाही.

सुनील कच्छवे , औरंगाबादस्मार्ट सिटीचा प्रकल्प अहवाल सादर करण्याची मुदत अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे; परंतु मनपाने विकासासाठी कोणते मॉडेल स्वीकारायचे हेच अद्याप निश्चित केलेले नाही. त्यामुळे प्रकल्प अहवालाचे काम रखडले आहे. त्याचा फटका आगामी काळात निवड प्रक्रियेत बसविण्याची भीती व्यक्त होत आहे.केंद्र सरकारने देशभरातील निवडक शहरांचा दर्जा सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी अभियान सुरू केले आहे. या अभियानाकरिता सरकारने औरंगाबादसह देशभरातील शंभर शहरांची निवड केली आहे. आता यातून पहिल्या वर्षी २०, दुसऱ्या वर्षी ४० आणि तिसऱ्या वर्षी ४० शहरांची निवड केली जाणार आहे. दुसऱ्या फेरीत निवडलेल्या शहरांना केंद्राकडून सलग पाच वर्षे भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व शंभर शहरांकडून पहिल्या वर्षी निवड होण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. औरंगाबाद मनपाने प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी नाईट फ्रँक-फोट्रेस नावाची पीएमसी नियुक्त केली आहे. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार पीएमसीने आॅक्टोबर महिन्यात शहरातील जनतेशी संवाद साधून कच्चे आराखडे तयार केले. स्मार्ट सिटीच्या विकासासाठी केंद्र सरकारने नवीनीकरण, पुनर्निर्माण आणि हरित क्षेत्र विकास, असे तीन मॉडेल ठरवून दिलेले आहेत. मनपाला यापैकी एक मॉडेल निश्चित करून त्यानुसार प्रकल्प अहवाल सादर करायचा आहे. पीएमसीने तिन्ही मॉडेल डोळ्यासमोर ठेवून काही कच्चे आराखडे बनविले आहेत. आता मनपाच्या सर्वसाधारण सभेने कोणते मॉडेल स्वीकारायचे हे ठरविल्यानंतर त्या प्रकारातील एका कच्च्या आराखड्यावर काम केले जाणार आहे; परंतु अद्याप मॉडेलच निश्चित झालेले नसल्यामुळे प्रकल्प अहवालाचे काम रखडले आहे. राज्य सरकारकडे प्रकल्प अहवाल सादर करण्याची मुदत २९ नोव्हेंबर आहे, तर केंद्राकडे हा अहवाल १५ डिसेंबरपर्यंत सादर करायचा आहे. कमी कालावधी राहिल्यामुळे आता एवढ्या मुदतीत चांगला अहवाल सादर करणे तसेच तो केंद्र स्तरावर इतर शहरांच्या तुलनेत टिकणे कठीण होणार आहे. अहवालावरच ठरणार निवडकेंद्र सरकार यंदा शंभर शहरांमधून २० शहरांची निवड करणार आहे. ही निवड या शहरांच्या प्रकल्प अहवालांवरून होणार आहे. हा अहवाल तयार करताना किमान दहा टक्के लोकांची मते विचारात घेण्याची अटही केंद्राने घालून दिली आहे. औरंगाबादेत आतापर्यंत अवघ्या साडेपाच हजार लोकांचीच मते पीएमसीकडे नोंदविली गेली आहेत. हे प्रमाण एक टक्काही नाही. आता कच्च्या आराखड्यावर जास्तीत जास्त लोकांची मते नोंदवून घेणे गरजेचे आहे; परंतु त्यासाठी पीएमसीकडे पुरेसा वेळ असणार नाही. मॉडेल निवडीवरून आयुक्त, पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद...स्मार्ट सिटीच्या विकासासाठी तीनपैकी एक मॉडेल निश्चित करायचे आहे. हा निर्णय मनपाला घ्यायचा आहे. मनपा आयुक्त प्रकाश महाजन हे हरित क्षेत्र विकासाच्या मॉडेल निवडण्याच्या बाजूने आहेत. यामध्ये शहराबाहेर किमान २५० एकर मोकळ्या जागेत नवीन शहर वसविणे अपेक्षित आहे. यामध्ये अडथळा उभा राहणार नसल्यामुळे हे मॉडेल निवडणे योग्य होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे, तर मनपातील पदाधिकारी पुनर्विकास मॉडेलला अनुकूल आहेत. पीएमसीने तीन आठवड्यांपूर्वी मनपात सादरीकरण केले. तेव्हा बहुतेक पदाधिकाऱ्यांनी मिल कॉर्नरजवळील ५० एकर जागेचा पुनर्विकास करणे सोयीचे होईल, अशी आशा व्यक्त केली.