शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

अडथळ्यांची शर्यत; प्रकल्प अहवालाचे काम रखडले

By admin | Updated: November 14, 2015 00:54 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद स्मार्ट सिटीचा प्रकल्प अहवाल सादर करण्याची मुदत अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे; परंतु मनपाने विकासासाठी कोणते मॉडेल स्वीकारायचे हेच अद्याप निश्चित केलेले नाही.

सुनील कच्छवे , औरंगाबादस्मार्ट सिटीचा प्रकल्प अहवाल सादर करण्याची मुदत अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे; परंतु मनपाने विकासासाठी कोणते मॉडेल स्वीकारायचे हेच अद्याप निश्चित केलेले नाही. त्यामुळे प्रकल्प अहवालाचे काम रखडले आहे. त्याचा फटका आगामी काळात निवड प्रक्रियेत बसविण्याची भीती व्यक्त होत आहे.केंद्र सरकारने देशभरातील निवडक शहरांचा दर्जा सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी अभियान सुरू केले आहे. या अभियानाकरिता सरकारने औरंगाबादसह देशभरातील शंभर शहरांची निवड केली आहे. आता यातून पहिल्या वर्षी २०, दुसऱ्या वर्षी ४० आणि तिसऱ्या वर्षी ४० शहरांची निवड केली जाणार आहे. दुसऱ्या फेरीत निवडलेल्या शहरांना केंद्राकडून सलग पाच वर्षे भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व शंभर शहरांकडून पहिल्या वर्षी निवड होण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. औरंगाबाद मनपाने प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी नाईट फ्रँक-फोट्रेस नावाची पीएमसी नियुक्त केली आहे. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार पीएमसीने आॅक्टोबर महिन्यात शहरातील जनतेशी संवाद साधून कच्चे आराखडे तयार केले. स्मार्ट सिटीच्या विकासासाठी केंद्र सरकारने नवीनीकरण, पुनर्निर्माण आणि हरित क्षेत्र विकास, असे तीन मॉडेल ठरवून दिलेले आहेत. मनपाला यापैकी एक मॉडेल निश्चित करून त्यानुसार प्रकल्प अहवाल सादर करायचा आहे. पीएमसीने तिन्ही मॉडेल डोळ्यासमोर ठेवून काही कच्चे आराखडे बनविले आहेत. आता मनपाच्या सर्वसाधारण सभेने कोणते मॉडेल स्वीकारायचे हे ठरविल्यानंतर त्या प्रकारातील एका कच्च्या आराखड्यावर काम केले जाणार आहे; परंतु अद्याप मॉडेलच निश्चित झालेले नसल्यामुळे प्रकल्प अहवालाचे काम रखडले आहे. राज्य सरकारकडे प्रकल्प अहवाल सादर करण्याची मुदत २९ नोव्हेंबर आहे, तर केंद्राकडे हा अहवाल १५ डिसेंबरपर्यंत सादर करायचा आहे. कमी कालावधी राहिल्यामुळे आता एवढ्या मुदतीत चांगला अहवाल सादर करणे तसेच तो केंद्र स्तरावर इतर शहरांच्या तुलनेत टिकणे कठीण होणार आहे. अहवालावरच ठरणार निवडकेंद्र सरकार यंदा शंभर शहरांमधून २० शहरांची निवड करणार आहे. ही निवड या शहरांच्या प्रकल्प अहवालांवरून होणार आहे. हा अहवाल तयार करताना किमान दहा टक्के लोकांची मते विचारात घेण्याची अटही केंद्राने घालून दिली आहे. औरंगाबादेत आतापर्यंत अवघ्या साडेपाच हजार लोकांचीच मते पीएमसीकडे नोंदविली गेली आहेत. हे प्रमाण एक टक्काही नाही. आता कच्च्या आराखड्यावर जास्तीत जास्त लोकांची मते नोंदवून घेणे गरजेचे आहे; परंतु त्यासाठी पीएमसीकडे पुरेसा वेळ असणार नाही. मॉडेल निवडीवरून आयुक्त, पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद...स्मार्ट सिटीच्या विकासासाठी तीनपैकी एक मॉडेल निश्चित करायचे आहे. हा निर्णय मनपाला घ्यायचा आहे. मनपा आयुक्त प्रकाश महाजन हे हरित क्षेत्र विकासाच्या मॉडेल निवडण्याच्या बाजूने आहेत. यामध्ये शहराबाहेर किमान २५० एकर मोकळ्या जागेत नवीन शहर वसविणे अपेक्षित आहे. यामध्ये अडथळा उभा राहणार नसल्यामुळे हे मॉडेल निवडणे योग्य होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे, तर मनपातील पदाधिकारी पुनर्विकास मॉडेलला अनुकूल आहेत. पीएमसीने तीन आठवड्यांपूर्वी मनपात सादरीकरण केले. तेव्हा बहुतेक पदाधिकाऱ्यांनी मिल कॉर्नरजवळील ५० एकर जागेचा पुनर्विकास करणे सोयीचे होईल, अशी आशा व्यक्त केली.