शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

औरंगाबादेत टँकरची शंभरी

By admin | Updated: May 14, 2014 00:28 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता मे महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता मे महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील पावणेदोनशे गावांना सध्या पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या १०० वर पोहोचली आहे. टंचाईग्रस्त गावांपैकी ६६ गावांना १०७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जानेवारीपासूनच जिल्ह्यात काही प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागली. मात्र, आता त्याची तीव्रता वाढली आहे. दररोज नवनवीन गावे पाणीटंचाईच्या फेर्‍यात येत आहेत. विशेषत: पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांत पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. या तीन तालुक्यांमध्ये सध्या शंभर गावे पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद, कन्नड आणि सिल्लोड तालुक्यांतही काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावे आणि त्यांना पाणीपुरवठा करणार्‍या टँकरच्या संख्येत बरीच भर पडली आहे. चालू आठवड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या पावणेदोनशेवर पोहोचली आहे. तर पाणीपुरवठ्याच्या टँकरच्या संख्येने शंभरी गाठली. सध्या जिल्ह्यात अधिक तीव्र पाणीटंचाई जाणवणार्‍या ६६ गावांना १०७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर उर्वरित गावांमध्ये जवळपासच्या विहिरी अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात पैठण तालुक्यात सर्वाधिक ३५ टँकर सुरू आहेत. सोयगाव आणि खुलताबाद या तालुक्यांमध्ये मात्र, अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही. जिल्ह्यात प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांना पाणी देण्यासाठी शक्य असेल त्या ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जिल्ह्यात १४१ गावांमध्ये एकूण १६४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यातील ३३ विहिरी पाणीपुरवठ्याचे टँकर भरण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. मराठवाड्यात आजघडीला २५१ टँकर सुरू आहेत. यामध्ये औरंगाबादमध्ये सर्वाधिक १०७ टँकर आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात ८५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ५२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय जालना जिल्ह्यात ४ आणि नांदेड जिल्ह्यात ३ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील टँकर संख्या तालुकाटँकर औरंगाबाद१३ फुलंब्री०४ पैठण३५ गंगापूर१९ वैजापूर३० कन्नड०२ सिल्लोड०४ एकूण१०७