शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

दीड लाख पुस्तकांचे वाटप

By admin | Updated: June 5, 2014 00:47 IST

कळंब : सर्वशिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणार्‍या मोफत पाठ्यपुस्तक योजनेमधून कळंब तालुक्यातील

कळंब : सर्वशिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणार्‍या मोफत पाठ्यपुस्तक योजनेमधून कळंब तालुक्यातील २४ हजार ८९६ विद्यार्थ्यांसाठी १ लाख ४९ हजार विविध विषयातील पाठ्यपुस्तकाचे गटशिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत वितरण करण्यात आले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व अनुदानीत असलेल्या १७७ शाळेमधील विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा लाभ मिळणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, नगर परिषदेच्या सर्व शाळा, खाजगी अनुदानीत व अंशत: अनुसुचित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शालेय पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. आर्थिक विवंचनेमुळे पाठ्यपुस्तकापासून कोणताही शालेय विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी सर्व शिक्षा अभियानामार्फत बालभारतीने प्रकाशित केलेली ही पाठ्यपुस्तके मोफत वाटप करण्यात येतात. कळंब तालुक्यातील इयत्ता १ ली व २ री च्या प्रत्येकी ३१०३, इयत्ता तिसरीच्या ३१८७, इयत्ता चौथीच्या ३०५१, इयत्ता पाचवीच्या ३१५९, सहावीच्या ३३६७, इयत्ता सातवीच्या ३१५७ तर आठवीच्या २५६९ शालेय विद्यार्थ्यांना ही मोफत पाठ्यपुस्तके प्रत्येक केंद्रनिहाय पोहोच करण्यात आली आहेत. तालुक्यातील २४८९६ विद्यार्थ्यांना १ लाख ४८ हजार ६६० पाठ्यपुस्तके गटशिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत. कळंब तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १४१ शाळा, नगर परिषदेच्या २ शाळा, खाजगी अनुदानित किंवा अंशत: अनुदानित असलेल्या ३४ अशा १७७ शाळांना या मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये बालभारती, महाइंग्लिश, परिसर अभ्यास भाग १, परिसर अभ्यास भाग २, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल आदी पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. दरम्यान, तालुक्यातील १७७ शाळातील विद्यार्थ्यांसाठी १ लाख ४८ हजार पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून, त्याचे जवळपास सर्व शाळांना वितरण झाले आहे. फक्त तिसरीचे परिसर अभ्यास व चौथीचे परिसर अभ्यास भाग १ प्राप्त होणे बाकी आहे. ही पुस्तकेही लवकरच मिळतील असे गटसमन्वयक संजय कुंभार यांनी सांगितले. (वार्ताहर) विनाअनुदानित शाळा वंचित तालुक्यात अनेक शाळा शासनमान्य परंतु, विना अनुदानित आहेत. शिवाय खाजगी इंग्रजी शाळेची संख्याही मोठी आहे. या शाळांमध्ये अनेक गोरगरीब परिवारातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु एकीकडे शासनाचे अनुदान उचलणार्‍या शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जात असताना ज्या शाळांना खरोखरच शासनाच्या मदतीची गरज आहे. अशा विनाअनुदानित शाळांना या योजनेपासून वंचित ठेवले जात आहे. यामुळे सर्व शिक्षा अभियानने अशा शाळांतील विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. ५४ हजार स्वाध्याय पुस्तिका शाळामधील अध्ययन व अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर अभ्यासक्रमाची उजळणी तसेच गृहपाठ करावा, यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नावलीवर आधारीत स्वाध्यायमाला मोफत देण्यात येतात. २०१४ साठी कळंब गटशिक्षणाधिकारी कार्यालयास ६ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ५४९०० स्वाध्याय पुस्तिका प्राप्त झाल्या आहेत.