शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

‘सरकारला अजून किती आत्महत्या हव्यात आहेत ?’

By admin | Updated: November 16, 2014 23:40 IST

बीड : संपूर्ण मराठवाड्यात पीक पाण्याची अतिशय वाईट स्थिती आहे. पाणी नाही, पिके गेली आता फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उरले आहे.

बीड : संपूर्ण मराठवाड्यात पीक पाण्याची अतिशय वाईट स्थिती आहे. पाणी नाही, पिके गेली आता फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उरले आहे. अशी सारी परिस्थिती असताना भाजपाचे सरकार मात्र दुष्काळ जाहीर करीत नाही. हे सरकार आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहणार आहे? असा सवाल विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी केला.ते रविवारी जिल्ह्याचा दुष्काळ पाहण्यासाठी आले होते. त्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुरंदरचे आ. विजय शिवतरे, आ. सदा सरवदे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांची उपस्थिती होती. शिंदे म्हणाले की, बीड जिल्ह्यात सिंचनाचा मोठ्याप्रमाणात अभाव आहे. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ मदत झाली पाहिजे. मदतीच्या दुष्टीकोनातून राज्य सरकार कुठलीच पावले उचलत नसल्याचे पहावयास मिळत आहे. शासनाने अद्याप पर्यंत जनावरांच्या चाऱ्याची देखील व्यवस्था केलेली नाही. दोन दिवसापुर्वी शासनाने आणेवारी काढली. ही आणेवारी बोगस आहे. ब्रिटीश कालीन पध्दतीने ही आनेवारी काढली जात आहे. आणेवारी काढण्याची पध्दत बदलून नवीन पध्दत लागू करावी, अशी मागणी करत शिंदे पुढे म्हणाले की, मी बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, येथील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असते. मात्र हे सरकार दुष्काळ निवारणासाठी कुठलेच ठोस पावले उचलत नाही असा आरोप शिंदे यांनी केला. यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब अंबूरे, सचिन मुळूक, पं. स. सदस्य विलास महाराज शिंदे, पंकज कुटे, विपुल पिंगळे, सुशील पिंगळे आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)