शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

आणखी किती बळी घेणार?

By admin | Updated: December 19, 2014 23:56 IST

कुठेही धोक्याची सूचना देणारे फलक नाहीत; जे आहेत, ते वाचता येत नाहीत; सेवा रस्त्यावरून महामार्गावर येण्यासाठी असलेल्या जागा,

लक्ष्मण मोरे, पुणेपुणे : कुठेही धोक्याची सूचना देणारे फलक नाहीत; जे आहेत, ते वाचता येत नाहीत; सेवा रस्त्यावरून महामार्गावर येण्यासाठी असलेल्या जागा, दुभाजक तोडून तयार केलेले ‘पंक्चर’ अशी अवस्था आहे कात्रज बोगदा ते नऱ्हे पुलादरम्यानची. मानवी चुका, महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि चुकीचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ याची शिक्षा निरपराधांना आपले प्राण गमावून मोजावी लागत आहे. शुक्रवारी सकाळी दरीपुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा बळी गेला. रस्त्याची चुकीची आखणी, वाहतुकीचे नसलेले नियोजन आणि बेशिस्त वाहनचालक ही येथील अपघातांची प्रमुख कारणे आहेत. दुरदृष्टीच्या अभावामुळे आणि ठेकेदारांशी असलेले लागेबांधे जपण्यासाठी महामार्ग प्राधिकरण नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. वाहतूक पोलिसांनी अपघातप्रवण क्षेत्र आणि रस्त्यामधील दुरुस्त्यांसंदर्भात अहवाल देऊनही त्यावर कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याचे वास्तव आहे. कात्रज बोगदा, नऱ्हे पूल आणि दरीपूल हा भाग मुंबई-बंगळुरु महामार्गावरील अपघातांमध्ये सर्वाधिक धोकादायक ठरत आहे. ‘लोकमत’ने शुुक्रवारी या अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी केली. काही ठिकाणी मानवी चुकांमुळे, तर काही ठिकाणी बांधकामातील चुकांमुळे अपघाती क्षेत्र तयार झाले आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि पुलाच्या कामांमध्ये फारशी प्रगती झालेली नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. (प्रतिनिधी)