शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

युद्ध संपले नसताना योद्ध्यांना कामावरून कमी कसे करता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:05 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कामगारांना कामावरून कमी करू नका. अन्यथा कोरोना संपला, असे जाहीर करून ...

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कामगारांना कामावरून कमी करू नका. अन्यथा कोरोना संपला, असे जाहीर करून व्यवहार सुरळीत करा, अशी मागणी ॲड. अभय टाकसाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनायोद्ध्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येत असल्याचे लोकमतने समोर आणले. त्याची दखल घेत विविध संस्था संघटनांकडून कोरोनायोद्ध्यांना कामावरून काढू नका, अशी मागणी होत आहे. कोरोना साथीच्या काळात घाटी रुग्णालय जीवनदायी ठरले. त्यामुळे रुग्णसंख्या घटल्याने ' गरज सरो वैद्य मरो' असे वागू नका. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी,कामगारांना घरी पाठवले जात आहे. हे संतापजनक व चीड आणणारे आहे, यातील एकही कामगार कर्मचारी यांना कामावरून काढून टाकू नये. अन्यथा महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा टाकसाळ यांनी निवेदनात दिला आहे. निवेदनावर विकास गायकवाड, महेंद्र मिसाळ, अभिजित बनसोडे, अजय सुरडकर, अमित भालेराव, आनंद सुरडकर, अतिश दांडगे, श्रीयोग वाघमारे, नंदा हिवराळे, नीता भालेराव, विद्या हिवराळे, नीलेश दिवेकर आदींच्या सह्या आहेत.