शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

सहा महिन्यांत पावणेतीनशे घरांचे नुकसान

By admin | Updated: July 28, 2014 00:57 IST

उस्मानाबाद : मागील सहा महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यासारख्या नैसर्गिक आपत्तीत २७६ कुटुंबियांच्या घराचे नुकसान झाले असून

उस्मानाबाद : मागील सहा महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यासारख्या नैसर्गिक आपत्तीत २७६ कुटुंबियांच्या घराचे नुकसान झाले असून, या आपत्तीग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत ३ लाख ४० हजार ६०० रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबियांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद विभागीय आयुक्ताकडे २२ लाख ५९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील बागा व शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सदरील शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अनुदानही देण्यात आले आहे. दरम्यान, या आपत्तीत उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, उमरगा, परंडा, कळंब या तालुक्यातील अनेकांच्या घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. यात अनेकांचे संसार उघड्यावर पडले. यातील काही नुकसानग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली असली तरी अनेकजण यापासून अद्याप वंचित आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत या आपत्तीग्रस्तांना ३ लाख ४० हजार ६०० रुपयांची रक्कम तहसीलदारांमार्फत वाटप केली आहे. यात उस्मानाबाद तालुक्यात १ लाख ९ हजार, तुळजापर १ लाख ९५ हजार ७००, भूूम १० हजार ८०० तर कळंब तालुक्यात २५ हजार १०० रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. उर्वरित कुटुंबियांनाही निधी प्राप्त होताच मदत वाटप करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तालुकानिहाय मागविलेला निधीजिल्हा प्रशासनाच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यासाठी ६ लाख, तुळजापूर ५ लाख, भूम २ लाख ९६ हजार ८००, कळंब ८० हजार, उमरगा ७ लाख ३७ हजार २००, परंडा २० हजार वाशी २५ हजार अशी एकूण २२ लाख ५९ हजार रुपयांच्या निधीची मागणी औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.