शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

४२ लाख प्रमाणपत्रांचे घरपोच वाटप

By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST

करमाड : महाराष्ट्र शासनाने सर्व सामाजिक योजना एका छत्राखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन महसूलमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात

करमाड : महाराष्ट्र शासनाने सर्व सामाजिक योजना एका छत्राखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन महसूलमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी करमाड येथे आयोजित महाराष्ट्र शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजनाप्रसंगी केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, शासनाने सर्व शासकीय लाभांच्या योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या ४ वर्षांत पाणंदमुक्ती अभियान रस्ते तयार झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे-येणे सोपे झाले आहे. विद्यार्थ्यांची शालेय शिक्षणात कुठल्याही दाखल्याची अडचण येऊ नये यासाठी यावर्षी इयत्ता ९ वी पर्यंतच्या ४२ लाख प्रमाणपत्रांचे घरपोच वाटप करण्यात आले आहे, तसेच आतापर्यंत महाराष्ट्रात १ कोटी ६० लाख प्रमाणपत्र वाटप झाल्याचे त्यांनी सांगितले. महा-ई-सेवा केंद्रामुळे ग्रामीण भागात ७/१२, नमुना नं. ८ व इतर प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहेत. आ. काळे यांनी विकासाच्या दृष्टीने पाच वर्षांचा आराखडा तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. मराठवाड्याच्या दुष्काळाबाबत मी तुमची मागणी मंत्रिमंडळासमोर मांडतो, असे आश्वासन दिले. यावेळी आ. डॉ. कल्याण काळे यांनी येत्या १५ आॅगस्टला औरंगाबाद शहर व ग्रामीणसाठी वेगवेगळ्या तहसीलची घोषणा करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री थोरात यांनी दीपप्रज्वलन करून केले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी बाप्पासाहेब थोरात यांनी केले. समाधान योजनेबाबत जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. करमाड ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कांताबाई मुळे, उपसरपंच कैलास उकर्डे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शारदाताई जारवाल, विलास औताडे, अभिजित देशमुख, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बबनराव कुंडारे उपस्थित होते. (वार्ताहर)