शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

बळीराजाच्या आशा पल्लवित

By admin | Updated: July 9, 2014 00:32 IST

लातूर : बरेच दिवस ओढ दिल्यानंतर वरुणराजाने मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे़ मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर बळीराजाची धाकधूक वाढली होती़

लातूर : बरेच दिवस ओढ दिल्यानंतर वरुणराजाने मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे़ मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर बळीराजाची धाकधूक वाढली होती़ यंदा खरीपाच्या पेरण्या होतील की नाही, अशीही चिंता व्यक्त करण्यात येत होती़ परंतु, रविवारी पूनर्वसू नक्षत्राचे आगमन होताच टप्प्याटप्प्याने जिल्हाभरात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे़ मंगळवारी पहाटे जवळपास सर्वच तालुक्यात पुनर्वसू बरसले़ त्यामुळे पेरण्यांना आता सुरुवात होण्याची अपेक्षा वाढली आहे़गतवर्षी जेथे जून महिन्यात १३५ मिलीमीटर पाऊस झाला होता़ तिथे यावर्षी केवळ ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे़ त्यातही प्रारंभीच्या टप्प्यात देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने अनेकांनी पेरण्या केल्या होत्या़ मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे़ जुलै महिन्याचा पहिला आठवडाही कोरडाच गेल्यानंतर मंगळवारी पहाटेपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे़ दुपारच्या सुमारासही काही भागात चांगला पाऊस झाला़ पहाटे झालेल्या पावसाची नोंद २४़३९ मिलीमीटर इतकी झाली आहे़ त्यात सर्वाधिक पाऊस उदगीर तालुक्यात ४६़७१ मिमी़ इतका झाला़ त्यापाठोपाठ जळकोट तालुक्यात ४०, शिरुर अनंतपाळ ३५, लातूर व चाकूर २८, देवणी १६, औसा व निलंगा १४, रेणापूर १३ तर सर्वात कमी अहमदपूर तालुक्यात ५ मिमी़ इतका पाऊस झाला आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़सोयाबीन पुन्हा वाढणाऱ़़दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत चालली आहे़ यंदाही अशीच परिस्थिती राहणार आहे़ सोयाबीनखालील सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९२ हजार हेक्टर्स इतके आहे़ त्यात यावेही ८ हजार हेक्टर्सनी वाढ होईल असा कृषी विभागाचा अंदाज होता़ परंतु, पाऊस लांबल्याने मूग, उडीदाची पेरणी आता जवळपास होणार नाही, अशी स्थिती आहे़ त्यामुळे पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊन यावेळी सव्वादोन लाख हेक्टर्सपर्यंत सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे़जूनमध्ये पाऊस होत नसल्याने शेतकरी खत-बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेकडे फिरकला नव्हता़ परंतु, पाऊस होईल या आशेवर गेल्या काही दिवसांपासून त्यांनी खरेदी सुरु केली होती़ आता पेरणीयोग्य पाऊस होत असल्याने आता बाजारपेठेत गर्दी आणखी वाढली आहे़जिल्ह्यात सर्वदूर पाऊस़़़सोमवारी संध्याकाळी लातूर शहरात दिवसभर पावसाची रिपरिप होती़ मंगळवारी सायंकाळी ६ वाजेनंतर तब्बल अर्धा तास मोठा पाऊस झाला़ जिल्ह्यातील चाकूर, अहमदपूर, रेणापूर, औसा, उदगीर व देवणी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे़ मृग आणि आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर बळीराजा धास्तावला होता़ त्यामुळे पेरण्याही रखडल्या होत्या़ मात्र रविवारपासून पावसाला प्रारंभ झाला़ त्यामुळे पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे़ दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अहमदपूर येथे मेघगर्जनेसह पाऊस झाला़ केवळ ८ टक्के पेरण्या़़़पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील पेरण्या यावेळी चांगल्याच खोळंबल्या आहेत़ आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत़ गतवर्षी जवळपास ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या़ यंदा पेरणी झालेल्या ४६१५० हेक्टर्स क्षेत्रापैकी ३१२६६ हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची पेरा झाला आहे़ ८२५६ हेक्टर्सवर तूर, ३०२५ हेक्टर्सवर ज्वारी, १५०४ हेक्टर्सवर मूग, १७२ हेक्टर्स उडीद तर चाऱ्यासाठी ४३९ हेक्टर्स क्षेत्रावर मक्याची लागवड करण्यात आली आहे़