शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

बळीराजाच्या आशा पल्लवित

By admin | Updated: July 9, 2014 00:32 IST

लातूर : बरेच दिवस ओढ दिल्यानंतर वरुणराजाने मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे़ मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर बळीराजाची धाकधूक वाढली होती़

लातूर : बरेच दिवस ओढ दिल्यानंतर वरुणराजाने मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे़ मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर बळीराजाची धाकधूक वाढली होती़ यंदा खरीपाच्या पेरण्या होतील की नाही, अशीही चिंता व्यक्त करण्यात येत होती़ परंतु, रविवारी पूनर्वसू नक्षत्राचे आगमन होताच टप्प्याटप्प्याने जिल्हाभरात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे़ मंगळवारी पहाटे जवळपास सर्वच तालुक्यात पुनर्वसू बरसले़ त्यामुळे पेरण्यांना आता सुरुवात होण्याची अपेक्षा वाढली आहे़गतवर्षी जेथे जून महिन्यात १३५ मिलीमीटर पाऊस झाला होता़ तिथे यावर्षी केवळ ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे़ त्यातही प्रारंभीच्या टप्प्यात देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने अनेकांनी पेरण्या केल्या होत्या़ मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे़ जुलै महिन्याचा पहिला आठवडाही कोरडाच गेल्यानंतर मंगळवारी पहाटेपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे़ दुपारच्या सुमारासही काही भागात चांगला पाऊस झाला़ पहाटे झालेल्या पावसाची नोंद २४़३९ मिलीमीटर इतकी झाली आहे़ त्यात सर्वाधिक पाऊस उदगीर तालुक्यात ४६़७१ मिमी़ इतका झाला़ त्यापाठोपाठ जळकोट तालुक्यात ४०, शिरुर अनंतपाळ ३५, लातूर व चाकूर २८, देवणी १६, औसा व निलंगा १४, रेणापूर १३ तर सर्वात कमी अहमदपूर तालुक्यात ५ मिमी़ इतका पाऊस झाला आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़सोयाबीन पुन्हा वाढणाऱ़़दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत चालली आहे़ यंदाही अशीच परिस्थिती राहणार आहे़ सोयाबीनखालील सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९२ हजार हेक्टर्स इतके आहे़ त्यात यावेही ८ हजार हेक्टर्सनी वाढ होईल असा कृषी विभागाचा अंदाज होता़ परंतु, पाऊस लांबल्याने मूग, उडीदाची पेरणी आता जवळपास होणार नाही, अशी स्थिती आहे़ त्यामुळे पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊन यावेळी सव्वादोन लाख हेक्टर्सपर्यंत सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे़जूनमध्ये पाऊस होत नसल्याने शेतकरी खत-बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेकडे फिरकला नव्हता़ परंतु, पाऊस होईल या आशेवर गेल्या काही दिवसांपासून त्यांनी खरेदी सुरु केली होती़ आता पेरणीयोग्य पाऊस होत असल्याने आता बाजारपेठेत गर्दी आणखी वाढली आहे़जिल्ह्यात सर्वदूर पाऊस़़़सोमवारी संध्याकाळी लातूर शहरात दिवसभर पावसाची रिपरिप होती़ मंगळवारी सायंकाळी ६ वाजेनंतर तब्बल अर्धा तास मोठा पाऊस झाला़ जिल्ह्यातील चाकूर, अहमदपूर, रेणापूर, औसा, उदगीर व देवणी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे़ मृग आणि आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर बळीराजा धास्तावला होता़ त्यामुळे पेरण्याही रखडल्या होत्या़ मात्र रविवारपासून पावसाला प्रारंभ झाला़ त्यामुळे पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे़ दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अहमदपूर येथे मेघगर्जनेसह पाऊस झाला़ केवळ ८ टक्के पेरण्या़़़पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील पेरण्या यावेळी चांगल्याच खोळंबल्या आहेत़ आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत़ गतवर्षी जवळपास ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या़ यंदा पेरणी झालेल्या ४६१५० हेक्टर्स क्षेत्रापैकी ३१२६६ हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची पेरा झाला आहे़ ८२५६ हेक्टर्सवर तूर, ३०२५ हेक्टर्सवर ज्वारी, १५०४ हेक्टर्सवर मूग, १७२ हेक्टर्स उडीद तर चाऱ्यासाठी ४३९ हेक्टर्स क्षेत्रावर मक्याची लागवड करण्यात आली आहे़