शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाच्या आशा पल्लवित

By admin | Updated: July 9, 2014 00:32 IST

लातूर : बरेच दिवस ओढ दिल्यानंतर वरुणराजाने मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे़ मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर बळीराजाची धाकधूक वाढली होती़

लातूर : बरेच दिवस ओढ दिल्यानंतर वरुणराजाने मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे़ मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर बळीराजाची धाकधूक वाढली होती़ यंदा खरीपाच्या पेरण्या होतील की नाही, अशीही चिंता व्यक्त करण्यात येत होती़ परंतु, रविवारी पूनर्वसू नक्षत्राचे आगमन होताच टप्प्याटप्प्याने जिल्हाभरात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे़ मंगळवारी पहाटे जवळपास सर्वच तालुक्यात पुनर्वसू बरसले़ त्यामुळे पेरण्यांना आता सुरुवात होण्याची अपेक्षा वाढली आहे़गतवर्षी जेथे जून महिन्यात १३५ मिलीमीटर पाऊस झाला होता़ तिथे यावर्षी केवळ ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे़ त्यातही प्रारंभीच्या टप्प्यात देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने अनेकांनी पेरण्या केल्या होत्या़ मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे़ जुलै महिन्याचा पहिला आठवडाही कोरडाच गेल्यानंतर मंगळवारी पहाटेपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे़ दुपारच्या सुमारासही काही भागात चांगला पाऊस झाला़ पहाटे झालेल्या पावसाची नोंद २४़३९ मिलीमीटर इतकी झाली आहे़ त्यात सर्वाधिक पाऊस उदगीर तालुक्यात ४६़७१ मिमी़ इतका झाला़ त्यापाठोपाठ जळकोट तालुक्यात ४०, शिरुर अनंतपाळ ३५, लातूर व चाकूर २८, देवणी १६, औसा व निलंगा १४, रेणापूर १३ तर सर्वात कमी अहमदपूर तालुक्यात ५ मिमी़ इतका पाऊस झाला आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़सोयाबीन पुन्हा वाढणाऱ़़दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत चालली आहे़ यंदाही अशीच परिस्थिती राहणार आहे़ सोयाबीनखालील सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९२ हजार हेक्टर्स इतके आहे़ त्यात यावेही ८ हजार हेक्टर्सनी वाढ होईल असा कृषी विभागाचा अंदाज होता़ परंतु, पाऊस लांबल्याने मूग, उडीदाची पेरणी आता जवळपास होणार नाही, अशी स्थिती आहे़ त्यामुळे पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊन यावेळी सव्वादोन लाख हेक्टर्सपर्यंत सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे़जूनमध्ये पाऊस होत नसल्याने शेतकरी खत-बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेकडे फिरकला नव्हता़ परंतु, पाऊस होईल या आशेवर गेल्या काही दिवसांपासून त्यांनी खरेदी सुरु केली होती़ आता पेरणीयोग्य पाऊस होत असल्याने आता बाजारपेठेत गर्दी आणखी वाढली आहे़जिल्ह्यात सर्वदूर पाऊस़़़सोमवारी संध्याकाळी लातूर शहरात दिवसभर पावसाची रिपरिप होती़ मंगळवारी सायंकाळी ६ वाजेनंतर तब्बल अर्धा तास मोठा पाऊस झाला़ जिल्ह्यातील चाकूर, अहमदपूर, रेणापूर, औसा, उदगीर व देवणी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे़ मृग आणि आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर बळीराजा धास्तावला होता़ त्यामुळे पेरण्याही रखडल्या होत्या़ मात्र रविवारपासून पावसाला प्रारंभ झाला़ त्यामुळे पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे़ दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अहमदपूर येथे मेघगर्जनेसह पाऊस झाला़ केवळ ८ टक्के पेरण्या़़़पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील पेरण्या यावेळी चांगल्याच खोळंबल्या आहेत़ आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत़ गतवर्षी जवळपास ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या़ यंदा पेरणी झालेल्या ४६१५० हेक्टर्स क्षेत्रापैकी ३१२६६ हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची पेरा झाला आहे़ ८२५६ हेक्टर्सवर तूर, ३०२५ हेक्टर्सवर ज्वारी, १५०४ हेक्टर्सवर मूग, १७२ हेक्टर्स उडीद तर चाऱ्यासाठी ४३९ हेक्टर्स क्षेत्रावर मक्याची लागवड करण्यात आली आहे़