शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या विम्यासाठी प्रमाणपत्रांची आडकाठी

By admin | Updated: August 12, 2014 02:00 IST

हिंगोली : सुरूवातीला माहिती आणि आता प्रमाणपत्रांअभावी खरीप हंगामाच्या पीक विम्याला मुकावे लागण्याची वेळ उत्पादकांवर ओढवली.

हिंगोली : सुरूवातीला माहिती आणि आता प्रमाणपत्रांअभावी खरीप हंगामाच्या पीक विम्याला मुकावे लागण्याची वेळ उत्पादकांवर ओढवली. दुसऱ्यांदा १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली तरी ३१ जुलैैनंतर पेरणी झालेल्याच उत्पादकांना विमा काढता येणार आहे; परंतु पेरण्या आधिच आटोपल्याने महसूल व कृषीच्या कर्मचाऱ्यांकडून आॅगस्टमधील पेरणीचे प्रमाणत्र दिले जात नाही अन् प्रमाणपत्रांअभावी बँकेत विमा काढता येत नाही. परिणामी, प्रमाणपत्रांची आडकाठी शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवत आहे.खरीप हंगामाच्या पीक विम्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली होती; पण बहुतांश उत्पादकांना या मुदतीपूर्वी विम्याची माहिती मिळाली नाही. परिणामी, ५६ टक्के उत्पादक विम्यापासून वंचित होते. म्हणून शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर १६ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली. मात्र त्यात ३१ जुलैैनंतर झालेल्या पेरणीच्या प्रमाणपत्रांची अट घालण्यात आली. महसूलचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकाने दिलेल्या प्रमाणपत्राची खातरजमा करूनच पीक विमा स्वीकरण्याचे आदेश बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांकडून ३१ जुलैैपूर्वी झालेल्या पेरणीचे प्रमाणपत्र स्वीकारल्या जात नसल्याने उत्पादकांची अडचण झाली. परिणामी, बहुतांश उत्पादकांना विमा काढण्याची इच्छा असतानाही सातबारा मिळत नाहीत. वंचित उत्पादकांची संख्या मोठी असल्याने अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा फटका बसत आहे. (प्रतिनिधी)