शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

खरिपाच्या विम्यासाठी प्रमाणपत्रांची आडकाठी

By admin | Updated: August 12, 2014 02:00 IST

हिंगोली : सुरूवातीला माहिती आणि आता प्रमाणपत्रांअभावी खरीप हंगामाच्या पीक विम्याला मुकावे लागण्याची वेळ उत्पादकांवर ओढवली.

हिंगोली : सुरूवातीला माहिती आणि आता प्रमाणपत्रांअभावी खरीप हंगामाच्या पीक विम्याला मुकावे लागण्याची वेळ उत्पादकांवर ओढवली. दुसऱ्यांदा १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली तरी ३१ जुलैैनंतर पेरणी झालेल्याच उत्पादकांना विमा काढता येणार आहे; परंतु पेरण्या आधिच आटोपल्याने महसूल व कृषीच्या कर्मचाऱ्यांकडून आॅगस्टमधील पेरणीचे प्रमाणत्र दिले जात नाही अन् प्रमाणपत्रांअभावी बँकेत विमा काढता येत नाही. परिणामी, प्रमाणपत्रांची आडकाठी शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवत आहे.खरीप हंगामाच्या पीक विम्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली होती; पण बहुतांश उत्पादकांना या मुदतीपूर्वी विम्याची माहिती मिळाली नाही. परिणामी, ५६ टक्के उत्पादक विम्यापासून वंचित होते. म्हणून शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर १६ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली. मात्र त्यात ३१ जुलैैनंतर झालेल्या पेरणीच्या प्रमाणपत्रांची अट घालण्यात आली. महसूलचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकाने दिलेल्या प्रमाणपत्राची खातरजमा करूनच पीक विमा स्वीकरण्याचे आदेश बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांकडून ३१ जुलैैपूर्वी झालेल्या पेरणीचे प्रमाणपत्र स्वीकारल्या जात नसल्याने उत्पादकांची अडचण झाली. परिणामी, बहुतांश उत्पादकांना विमा काढण्याची इच्छा असतानाही सातबारा मिळत नाहीत. वंचित उत्पादकांची संख्या मोठी असल्याने अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा फटका बसत आहे. (प्रतिनिधी)