शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

‘मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि विकास आंदोलनाचा इतिहास नव्याने लिहिण्याची गरज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि मराठवाडा विकास आंदोलनाचा इतिहास नीटपणाने लिहिला गेला नाही. भावी पिढीला हा इतिहास माहीत ...

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि मराठवाडा विकास आंदोलनाचा इतिहास नीटपणाने लिहिला गेला नाही. भावी पिढीला हा इतिहास माहीत होणे गरजेचे आहे. म्हणून तो नव्याने लिहिण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी क्रांतिवीर दत्तोबा भोसले-मातोळकर यांच्या सुधारित स्मृतिग्रंथाच्या प्रकाशन समारंभात केले.

शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला.

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे, मानसिंग पवार, ज्येष्ठ विधिज्ञ शशिकुमार चौधरी यांची यावेळी भाषणे झाली. क्रांतिवीर दत्तोबा भोसले-मातोळकर यांच्या शौर्याच्या आणि त्यांच्या पुरोगामित्वाच्या अनेक कथा सांगत या सर्वांनी हा इतिहास नीट लिहिला गेला नसल्याची खंत व्यक्त केली. स.भु. शिक्षण संस्थेने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने मराठवाडा विकास आंदोलनाचा इतिहास लिहिण्याकामी पुढाकार घ्यावा, अशी सूचना मानसिंग पवार यांनी केली.

स.भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आमदार सतीश चव्हाण यांची मंचावर उपस्थिती होती. या दोघांनी ही जबाबदारी स्वीकारावी, असा मानसिंग पवार यांचा आग्रह होता.

दत्तोबा भोसले आणि त्यांच्यासारख्या क्रांतिवीरांच्या इतिहासाकडे पाठ करून चाललोय. हे कृतघ्नपणाचे लक्षण होय, असे मत रा.रं. बोराडे यांनी व्यक्त केले.

माजी खासदार उत्तमसिंग पवार, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, किशोर शितोळे, बाबा भांड, प्रताप बोराडे, पद्माकर मुळे, प्रा.विजय‌ पाथ्रीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अच्युत भोसले, सुरेश कुटे, चंद्रशेखर जाधव, पृथ्वीराज भोसले, रोहन काकडे, रमेश कुटे, मुरलीधर बनसोडे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले.

कादंबरी भोसले, अनुजा भोसले, तनुजा भोसले, कुमुदिनी भोसले, श्रेया भोसले, अरविंद भोसले, तन्मय भोसले आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला.

समाजाची म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?

दत्तोबा भोसले हे पुरोगामी होते. निजामास त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. त्यांना पकडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. इतिहास, साहित्य, बहुजन समाज आणि मराठवाडा यात तारतम्य नाही. दत्तोबा भोसले, काकासाहेब देशमुख, दगडाबाई शेळके यांच्यासारखे लढवय्ये या लढ्यात होते म्हणून हा लढा यशस्वी झाला. हा इतिहास त्यांच्या कुटुंबीयांनीच सांगितला पाहिजे का? समाजाची म्हणून काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल यावेळी वक्त्यांनी उपस्थित केला.

प्रा.विजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सरोजिनी पंडित यांनी सूत्रसंचालन केले. विवेक भोसले यांनी आभार मानले.