शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कुशल मनुष्यबळाच्या टंचाईमुळे महामार्गाच्या कामाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे समृद्धी महामार्गावरील सुमारे ३५ टक्के परप्रांतीय मजूर घाबरून गावी ...

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे समृद्धी महामार्गावरील सुमारे ३५ टक्के परप्रांतीय मजूर घाबरून गावी निघून गेले आहेत. तत्पूर्वी, होळीच्या सणाला गेलेले १५ टक्के मजूर लॉकडाऊनच्या धास्तीने परत आलेच नाहीत. सध्या ५० टक्के मजूर साईटवर थोपवून धरण्यात आले असले तरी कुशल मनुष्यबळाच्या टंचाईमुळे या महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात खोळंबल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातून गेलेल्या ११२ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम ‘मेगा इंजिनिअरिंग’ आणि ‘लार्सन अँड टुब्रो’ (एल अँड टी) या दोन कंत्राटदार संस्था करत आहेत. जालन्यापासून माळीवाड्याच्या अलिकडे ‘मेगा’, तर ‘माळीवाड्यापासून नाशिकच्या हद्दीपर्यंत ‘एल अँड टी’ ही कंत्राटदार संस्था काम करीत आहे. पूर्वी ‘एल अँड टी’कडे २५०० मजूर आणि ‘मेगा’कडे जवळपास ३००० मजूर काम करीत होते. सध्या ‘मेगा’कडे ९००, तर ‘एल अँड टी’कडे ७०० परप्रांतीय मजूर थोपवून धरण्यात आले आहेत. उर्वरित मजुरांपैकी १५ टक्के मजूर आधीच होळीच्या सणासाठी गावी निघून गेले होते. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली. लॉकडाऊन लागेल, या भीतीपोटी ते परतलेच नाहीत. आता उर्वरित ३५ टक्के परप्रांतीय मजूर कोरोना संसर्ग वाढत चालल्यामुळे गावी निघून गेले आहेत. यामध्ये कुशल व तांत्रिक मजुरांची मोठी संख्या आहे. त्यामुळे इंटरचेंज, रेल्वेक्रॉसिंग ब्रिज, बोगदा किंवा अन्य तत्सम कामे कुशल मनुष्यबळाअभावी मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत.

महामार्गाच्या कामासाठी आणलेली मोठमोठी यंत्र चालविणाऱ्या मनुष्यबळअभावी पडून आहेत. इंटरचेंजच्या कामासाठी मोठमोठे काँक्रिट पेव्हर बसविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. लासूर स्टेशनजवळ रेल्वे क्रॉसिंग पुलासाठी गर्डल उचलणारे मोठमोठे क्रेन आहेत. पण, ते चालविणारे तंत्रज्ञ नाहीत. ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे फॅब्रिकेशनची कामे थांबली आहेत.

चौकट...........

५० टक्केही काम सुरू नाही

यासंदर्भात ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले की, सध्या समृद्धी महामार्गावर दोन्ही कंत्राटदार संस्थांना ५० टक्के परप्रांतीय मजूर थोपवून धरण्यात यश आले असले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे ५० टक्केही काम सुरू नाही. यंत्रे चालविणारे तांत्रिक मजूर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री उभी आहे. लॉकडाऊन, ऑक्सिजनचा अभाव आणि मजुरांअभावी या महामार्गाची कामे जवळपास दोन महिने पुढे गेली आहेत.