शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कुशल मनुष्यबळाच्या टंचाईमुळे महामार्गाच्या कामाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे समृद्धी महामार्गावरील सुमारे ३५ टक्के परप्रांतीय मजूर घाबरून गावी ...

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे समृद्धी महामार्गावरील सुमारे ३५ टक्के परप्रांतीय मजूर घाबरून गावी निघून गेले आहेत. तत्पूर्वी, होळीच्या सणाला गेलेले १५ टक्के मजूर लॉकडाऊनच्या धास्तीने परत आलेच नाहीत. सध्या ५० टक्के मजूर साईटवर थोपवून धरण्यात आले असले तरी कुशल मनुष्यबळाच्या टंचाईमुळे या महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात खोळंबल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातून गेलेल्या ११२ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम ‘मेगा इंजिनिअरिंग’ आणि ‘लार्सन अँड टुब्रो’ (एल अँड टी) या दोन कंत्राटदार संस्था करत आहेत. जालन्यापासून माळीवाड्याच्या अलिकडे ‘मेगा’, तर ‘माळीवाड्यापासून नाशिकच्या हद्दीपर्यंत ‘एल अँड टी’ ही कंत्राटदार संस्था काम करीत आहे. पूर्वी ‘एल अँड टी’कडे २५०० मजूर आणि ‘मेगा’कडे जवळपास ३००० मजूर काम करीत होते. सध्या ‘मेगा’कडे ९००, तर ‘एल अँड टी’कडे ७०० परप्रांतीय मजूर थोपवून धरण्यात आले आहेत. उर्वरित मजुरांपैकी १५ टक्के मजूर आधीच होळीच्या सणासाठी गावी निघून गेले होते. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली. लॉकडाऊन लागेल, या भीतीपोटी ते परतलेच नाहीत. आता उर्वरित ३५ टक्के परप्रांतीय मजूर कोरोना संसर्ग वाढत चालल्यामुळे गावी निघून गेले आहेत. यामध्ये कुशल व तांत्रिक मजुरांची मोठी संख्या आहे. त्यामुळे इंटरचेंज, रेल्वेक्रॉसिंग ब्रिज, बोगदा किंवा अन्य तत्सम कामे कुशल मनुष्यबळाअभावी मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत.

महामार्गाच्या कामासाठी आणलेली मोठमोठी यंत्र चालविणाऱ्या मनुष्यबळअभावी पडून आहेत. इंटरचेंजच्या कामासाठी मोठमोठे काँक्रिट पेव्हर बसविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. लासूर स्टेशनजवळ रेल्वे क्रॉसिंग पुलासाठी गर्डल उचलणारे मोठमोठे क्रेन आहेत. पण, ते चालविणारे तंत्रज्ञ नाहीत. ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे फॅब्रिकेशनची कामे थांबली आहेत.

चौकट...........

५० टक्केही काम सुरू नाही

यासंदर्भात ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले की, सध्या समृद्धी महामार्गावर दोन्ही कंत्राटदार संस्थांना ५० टक्के परप्रांतीय मजूर थोपवून धरण्यात यश आले असले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे ५० टक्केही काम सुरू नाही. यंत्रे चालविणारे तांत्रिक मजूर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री उभी आहे. लॉकडाऊन, ऑक्सिजनचा अभाव आणि मजुरांअभावी या महामार्गाची कामे जवळपास दोन महिने पुढे गेली आहेत.