शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

दलितांमध्ये सर्वाधिक गरिबी मराठवाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:28 IST

देशात मराठवाड्यातील दलितांमध्ये सर्वाधिक गरिबी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशात मराठवाड्यातील दलितांमध्ये सर्वाधिक गरिबी आहे. सध्या दलितांमध्ये जो काही विकास दिसून येतो तो केवळ राज्यघटना, शिक्षण आणि आरक्षणामुळेच. परंतु प्रस्थापित व्यवस्थेने या तीनही घटकांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केल्यामुळे या समाजाची स्थिती हलाखीची झाली आहे, असे प्रतिपादन इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्चचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी केले.नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ दलित स्टडीज आणि नागपूर येथील असोसिएशन फॉर सोशल अँड इकॉनॉमिक इक्वॉलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रामध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. वाल्मीक सरवदे, दिनकर ओंकार यांची उपस्थिती होती. डॉ. थोरात यांनी केलेल्या संशोधनामध्ये मराठवाड्यातील दलित हा अनुसूचित जमातीतील नागरिकांपेक्षाही गरीब असल्याचा निष्कर्ष निघाला असून, त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर त्यांनी या कार्यशाळेत भाष्य केले.विविध चार सत्रांमध्ये झालेल्या या कार्यशाळेत ते पुढे म्हणाले की, या देशातील शोषित, वंचित, पीडित वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतच शिक्षण व आरक्षणाची तरतूद केली.मात्र, सत्ताधाºयांनी सातत्याने राज्यघटना, आरक्षण आणि शिक्षणावरच आघात करून दलितांना संधी नाकारण्याचे षड्यंत्र रचले आहे. खाजगीकरणाच्या माध्यमातून दलितांवर बेरोजगारीचे संकट कोसळले. खाजगीकरणामुळे महाराष्ट्र सरकार हे शिपायांपासून अधिकाºयांपर्यंतची पदे कंत्राटी पद्धतीने भरत असल्यामुळे घटनेने दलितांच्या वाट्याला आलेले आरक्षण संपुष्टात येत आहे. खाजगीकरणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या नव्या बाजारपेठा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जिल्हा परिषदांच्या शाळा बंद पडत असून, दलितांना महागडे शिक्षण घेणे शक्य नाही.दलित तरुण स्वयंरोजगारासाठी पुढे आला तर बँका त्यांना कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. अशा परिस्थितीत सरकारने बँकांना कर्जपुरवठा करण्यासाठी आदेश देण्याची व्यापक भूमिका बजावली पाहिजे. केवळ जातीय मानसिकतेतून मराठवाड्यातील ग्रामीण भागात मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत दलितांच्या महिलांना पोषण आहार तयार करण्याचे काम दिले जात नाही. दलितांना बळजबरीने अत्यंत जोखमीचे काम लादले जाते. दलितांना आपला विकास साधायचा असेल, तर त्यांनी आपल्या मूळ प्रश्नांवर लढा उभारावा लागेल.