शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

टँकरवर सर्वांधिक १७ कोटी खर्च

By admin | Updated: September 7, 2014 00:41 IST

औरंगाबाद : चालू आठवड्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई पूर्णपणे दूर झाली असली तरी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला.

औरंगाबाद : चालू आठवड्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई पूर्णपणे दूर झाली असली तरी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. एप्रिलपासून आॅगस्टअखेरपर्यंत म्हणजे गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात टँकर आणि विहीर अधिग्रहणासह इतर उपाययोजनांवर तब्बल १९ कोटी ६९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १७ कोटी रुपये टँकरवर खर्च झाले आहेत.औरंगाबाद जिल्ह्यास यंदा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. जानेवारी महिन्यापासून अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. याशिवाय ठिकठिकाणी विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. तसेच नळ योजना दुरुस्ती, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीर, तात्पुरती पूरक नळ योजना राबविणे आदी उपाययोजनाही केल्या जात होत्या. मार्चपासून टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे जिल्ह्यात टँकरची संख्या सातत्याने वाढत गेली. जुलैमध्ये जिल्ह्यात अडीचशे गावांना तब्बल ३३३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. याशिवाय साडेतीनशे गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. मात्र, आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. सलग चार ते पाच दिवस झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्याचे आटलेले स्रोत पुन्हा जिवंत झाले. त्यामुळे १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व टँकर बंद झाले. एकट्या आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांवर ७ कोटी रुपयांचा खर्च झाला. तर एप्रिलपासून ३० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात टंचाई निवारणावर १९ कोटी ६९ लाख रुपये खर्च झाले आहेत.