शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

टँकरवर सर्वांधिक १७ कोटी खर्च

By admin | Updated: September 7, 2014 00:41 IST

औरंगाबाद : चालू आठवड्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई पूर्णपणे दूर झाली असली तरी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला.

औरंगाबाद : चालू आठवड्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई पूर्णपणे दूर झाली असली तरी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. एप्रिलपासून आॅगस्टअखेरपर्यंत म्हणजे गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात टँकर आणि विहीर अधिग्रहणासह इतर उपाययोजनांवर तब्बल १९ कोटी ६९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १७ कोटी रुपये टँकरवर खर्च झाले आहेत.औरंगाबाद जिल्ह्यास यंदा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. जानेवारी महिन्यापासून अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. याशिवाय ठिकठिकाणी विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. तसेच नळ योजना दुरुस्ती, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीर, तात्पुरती पूरक नळ योजना राबविणे आदी उपाययोजनाही केल्या जात होत्या. मार्चपासून टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे जिल्ह्यात टँकरची संख्या सातत्याने वाढत गेली. जुलैमध्ये जिल्ह्यात अडीचशे गावांना तब्बल ३३३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. याशिवाय साडेतीनशे गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. मात्र, आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. सलग चार ते पाच दिवस झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्याचे आटलेले स्रोत पुन्हा जिवंत झाले. त्यामुळे १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व टँकर बंद झाले. एकट्या आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांवर ७ कोटी रुपयांचा खर्च झाला. तर एप्रिलपासून ३० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात टंचाई निवारणावर १९ कोटी ६९ लाख रुपये खर्च झाले आहेत.