शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

खुंटेवाडीतील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचा लळा !

By admin | Updated: April 4, 2017 23:21 IST

तामलवाडी उच्चशिक्षणाचा लळा लागल्याने अवघ्या दोनशे उंबरठ्याच्या या गावाचे चित्र झपाट्याने बदलले आहे.

संतोष मगर तामलवाडीजिरायत शेती, त्यामुळे उत्पन्न नाही. उद्योग, व्यवसायाचा अभाव असल्याने हाताला रोजगारही नाही. अशा बिकट परिस्थितीत आयुष्य बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालकांनी पाल्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले आणि पाहता पाहता गावात प्राध्यापक, इंजिनिअर, शास्त्रज्ञांची फौजच उभी राहिली. उच्चशिक्षणाचा लळा लागल्याने अवघ्या दोनशे उंबरठ्याच्या या गावाचे चित्र झपाट्याने बदलले आहे. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी हे साधारण एक हजार लोकवस्तीचे गाव. गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत नाही, स्वतंत्र महसूल दर्जा नाही. एवढेच कशाला पोस्ट आॅफिस, रेशन दुकानही नाही. येथे दोनएकशे कुटुंबे येथे राहतात. शेती हाच ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय असला तरी पाण्याची कसलीही शाश्वती नसल्याने त्यावर संसाराचा गाडा हाकणे अवघड झालेले. परिसरात उद्योगधंद्याचाही अभाव. त्यामुळे गावात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली. अशा स्थितीत शिक्षण हाच परिवर्तनासाठीचा एकमेव मार्ग असल्याचे शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मनावर बिंबविल्यानंतर पालकांनी जागरूकपणे पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रीय केले. आज २३ वर्षानंतर या गावात उच्चशिक्षितांची नवी पिढी उदयास आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे खुंटेवाडीत केवळ पहिली ते चौथीपर्यंतच्याच शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र त्यानंतरही आर्थिक झळ सोसून पाल्यांच्या शिक्षणात कमी पडणार नाही याची दक्षता पालकांनी घेतली. त्यामुळेच येथील अनेकजण आज सोलापूरसह इतर शहरात उच्चशिक्षण घेत असताना दिसतात.