शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

साडेतीन कोटी खर्चूनही गळती थांबेना

By admin | Updated: May 20, 2014 01:07 IST

प्रकाश मिरगे, जाफराबाद लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ‘मॅजिकशो’, ‘रोड शो’ संपले असून शहरातील ‘वॉटर शो’ चे आता काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रकाश मिरगे, जाफराबाद लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ‘मॅजिकशो’, ‘रोड शो’ संपले असून शहरातील ‘वॉटर शो’ चे आता काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जाफराबाद शहरामध्ये राज्य मॉडेल म्हणून ओळख असलेली जाफराबाद पाणीपुरवठा योजना पूर्णत: बिनकामी ठरत आहे. या योजनेसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. तरीही सदरील योजनेला कायम गळती लागलेली आहे. योजनेला आजारपणातून सावरण्यासाठी परत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने लाखो रुपयांचे वाढीव प्रस्ताव सादर करुन मंजूर करुन घेतले आहेत, हे विशेष! विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी ते तळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत गेल्या निवडणुकीमध्ये घरची भाकरी खाऊन मोठी मेहनत घेतल्याचे सांगत आहे. अशीच मेहनत शहरातील पाणी टंचाई समस्याविषयी घ्यावी, असे वाटणे साहजिकच आहे. उन्हाळा असो की पावसाळा; जाफराबादकरांचा पाणीटंचाईच्या भीतीने नेहमीच अंगावर काटा येतो. तसा नेत्यांच्या अंगावरही काटा येतो. परंतु तो निवडणुकीतील काळापर्यंतच. नेतेमंडळी आपली तहान कशीतरी भागवतात. नागरिकांना मात्र आपली तहान दररोज पैसे मोजून भागवावी लागत आहे. याचे कोणतेही सोयरसुतक प्रशासनास अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींना नसल्याचे चित्र आहे. गेल्या आर्थिक वर्षात तालुक्यात पावसाने वार्षिक उच्चांक गाठून सरासरी पेक्षाही दुपटीने पाऊस पडला आहे. तरी सुध्दा पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नवीन योजना कार्यान्वित होऊन एक वर्ष होत आहे. परंतु पूर्णा नदीच्या पात्रातून (खडकपूर्णा) येणारा पाणीपुरवठा जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचतच नसल्याचे सध्याचे चित्र आहे. अंतर्गत पाणीपुरवठा जलवाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे खरे कारण आहे. जलशुध्दीकरण केंद्राची देखील अशीच काही अवस्था होऊन बसली आहे. यातून होणारा पाणीपुरवठा अत्यंत दूषित होत असून सदरील पाणीपुरवठा योजना ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी हस्तांतरित कराव्ी असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पाणी पुरवठा योजनेमध्ये काही त्रुटी असतांना ग्राम पंचायत पदाधिकार्‍यांची भूमिकाही संशयास्पदच वाटत आहे. राज्यात आदर्श ठरलेली पाणीपुरवठा योजना कुचकामी गतवर्षी पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खडकपूर्णा जलाशयातून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. ही योजना राज्यात आदर्श अशी ठरली होती. या योजनेमुळे जाफराबादेतील पाणीटंचाई कायमस्वरुपी संपणार अशी आशा निर्माण झाली होती. असे असूनही ही योजना अत्यंत कुचकामी ठरली आहे. जाफराबादवासियांना बारमही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. साडेतीन कोटी रुपये खर्च करुनही उपयोग काय, असा सवाल सर्व सामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. योजनेची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.