शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शहरात ३ कोटींच्या औषधींवर ‘टाच’

By admin | Updated: March 17, 2016 00:27 IST

औरंगाबाद : फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या तब्बल ३४४ औषधांवर तज्ज्ञ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे.

औरंगाबाद : फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या तब्बल ३४४ औषधांवर तज्ज्ञ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे. शहरातील केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने नोंदणीकृत ३० होलसेलर्स व ६०० किरकोळ औषधी विक्रेत्यांना या औषधी विक्री न करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी शहरात ३ कोटींपेक्षा अधिक मूल्यांच्या औषधीवर ‘टाच’ आली आहे. उल्लेखनीय म्हणजे औषधी कंपन्यांनी सध्या दुकानदारांना बंदी घातलेल्या औषधींचा साठा तुमच्याकडेच ठेवा, असा सल्लाही दिला आहे. यामुळे औषध विक्रेत्यांना पुढील आदेश येईपर्यंत ही औषधी सांभाळावी लागणार आहेत. बंदी घातलेल्या ३४४ औषधांमध्ये वेदनाशमक, सर्दी, अंगदुखी, पोटदुखीवरील औषधांचा समावेश आहे. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनचा रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतो. या औषधांच्या अतिमात्रेमुळे विकलांगता येण्याची शक्यता असल्याचे सांगत तज्ज्ञ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने औषधांवर बंदी आणली. या बंदीची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजकुमार झाडबुके यांनी मंगळवारी औरंगाबाद केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नंतर औषधी भवन येथे संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत ३० होलसेलर्सची बैठक घेण्यात आली. शहरातील ६०० विक्रेत्यांच्या मोबाईलवर ३४४ औषधींवर बंदी आणल्याचा मेसेज संघटनेने पाठविला आहे. यासंदर्भात औषधी वितरक भगवानदास काबरा यांनी सांगितले की, होलसेलरने बंदी घातलेली औषधी विक्री बंद केली असून आमच्याकडे किती स्टॉक आहे, त्याची नोंदणी व ती औषधीचे पॅकिंग करणे सुरू केले आहे.सिडकोतील औषधी विक्रेता गणेश लड्डा यांनी सांगितले की, प्रत्येक किरकोळ विक्रेत्याकडे बंदी घातलेल्या औषधीचा २० ते २५ टक्के साठा आहे. पुढील आदेश आल्यावर आम्ही औषधींचा साठा होलसेलरला पाठवू व ते कंपन्यांना परत पाठवतील. मात्र सध्या आमची रक्कम या औषधीत अडकली आहे.