शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शहरात ३ कोटींच्या औषधींवर ‘टाच’

By admin | Updated: March 17, 2016 00:27 IST

औरंगाबाद : फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या तब्बल ३४४ औषधांवर तज्ज्ञ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे.

औरंगाबाद : फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या तब्बल ३४४ औषधांवर तज्ज्ञ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे. शहरातील केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने नोंदणीकृत ३० होलसेलर्स व ६०० किरकोळ औषधी विक्रेत्यांना या औषधी विक्री न करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी शहरात ३ कोटींपेक्षा अधिक मूल्यांच्या औषधीवर ‘टाच’ आली आहे. उल्लेखनीय म्हणजे औषधी कंपन्यांनी सध्या दुकानदारांना बंदी घातलेल्या औषधींचा साठा तुमच्याकडेच ठेवा, असा सल्लाही दिला आहे. यामुळे औषध विक्रेत्यांना पुढील आदेश येईपर्यंत ही औषधी सांभाळावी लागणार आहेत. बंदी घातलेल्या ३४४ औषधांमध्ये वेदनाशमक, सर्दी, अंगदुखी, पोटदुखीवरील औषधांचा समावेश आहे. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनचा रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतो. या औषधांच्या अतिमात्रेमुळे विकलांगता येण्याची शक्यता असल्याचे सांगत तज्ज्ञ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने औषधांवर बंदी आणली. या बंदीची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजकुमार झाडबुके यांनी मंगळवारी औरंगाबाद केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नंतर औषधी भवन येथे संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत ३० होलसेलर्सची बैठक घेण्यात आली. शहरातील ६०० विक्रेत्यांच्या मोबाईलवर ३४४ औषधींवर बंदी आणल्याचा मेसेज संघटनेने पाठविला आहे. यासंदर्भात औषधी वितरक भगवानदास काबरा यांनी सांगितले की, होलसेलरने बंदी घातलेली औषधी विक्री बंद केली असून आमच्याकडे किती स्टॉक आहे, त्याची नोंदणी व ती औषधीचे पॅकिंग करणे सुरू केले आहे.सिडकोतील औषधी विक्रेता गणेश लड्डा यांनी सांगितले की, प्रत्येक किरकोळ विक्रेत्याकडे बंदी घातलेल्या औषधीचा २० ते २५ टक्के साठा आहे. पुढील आदेश आल्यावर आम्ही औषधींचा साठा होलसेलरला पाठवू व ते कंपन्यांना परत पाठवतील. मात्र सध्या आमची रक्कम या औषधीत अडकली आहे.