शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

जालना जिल्ह्यात उन्हाचा पारा ४३ अंशांवर

By admin | Updated: June 2, 2014 00:53 IST

जालना :जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे तपमान ४३ अंशांवर गेल्याने उष्णतेच्या लाटमुळे आबालवृद्धांचे हाल होत आहेत.

 जालना :जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे तपमान ४३ अंशांवर गेल्याने उष्णतेच्या लाटमुळे आबालवृद्धांचे हाल होत आहेत. शुक्रवारी रेकॉर्डब्रेक तापमानामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट उसळली असून, जनजीवन प्रभावित झाले आहे. दररोज तापमान वाढत जात आहे. उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रुग्णांलयामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दर रोज उन्हाचा पारा चढत आहे. शहरी भागात कडक उन्हामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाच्या झळा बसत आहेत. दुपारच्या वेळी तर कडक ऊन पडत असल्याने रस्ते निर्मनुष्य झाले आहे. रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो. बाजारपेठेतही दुपारच्या वेळी फारशी गर्दी दिसून येत नाही. घराबाहेर पडताना नागरिक रूमाल बांधतात. ग्रामीण भागातही कडक उन्हामुळे मशागतीच्या कामावर झाला आहे. मागील आठ दिवसांपासून तापमान ४२ अंशांच्या वर आहे. शुक्रवारी तापमानात वाढ झाली ४३ अंशांवर तापमान गेले होते. सकाळपासून ते दुपारपर्यंत कडक ऊन पडलेले होते. सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण झाल्याने उकाड्यात वाढ झाली होती. उकाड्याचा लहान मुले व वृद्धांना मोठा त्रास होत आहे. त्यातच विजेच्या भारनियमनामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. (प्रतिनिधी)