शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

साठवणीच्या पाण्यावर घेतले हळदीचे पीक

By admin | Updated: January 14, 2016 23:25 IST

परभणी ; विहिरीतील साठवणीच्या पाण्याचा आधार घेऊन ठिबक सिंचनाद्वारे या पाण्याचा वापर करून परभणी तालुक्यातील झरी येथील शेतकऱ्याने हळदीचे पीक घेतले़ कमी पाण्यावर पाच एकरात घेतलेले पीक बहरात आले आहे़

परभणी ; विहिरीतील साठवणीच्या पाण्याचा आधार घेऊन ठिबक सिंचनाद्वारे या पाण्याचा वापर करून परभणी तालुक्यातील झरी येथील शेतकऱ्याने हळदीचे पीक घेतले़ कमी पाण्यावर पाच एकरात घेतलेले पीक बहरात आले आहे़ तालुक्यातील झरी येथील शेतकरी संतोष देशमुख यांनी हा प्रयोग केला आहे़ मागील चार वर्षांपासून निसर्गाने साथ सोडली आहे़ अशा स्थितीत हताश न होता, संतोष देशमुख यांनी शेतात विविध प्रयोग राबविले़ शेतातील विहिरीत साठवलेल्या पाण्याचा त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे वापर करून मागील आठ महिन्यांपूर्वी शेतात हळद पिकाची लागवड केली़ पाच एकर शेतामध्ये ४ बाय ४ प्रमाणे ही लागवड करण्यात आली़ या पिकातून त्यांना एकरी दोन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे़ एका एकरात त्यांनी काही क्विंटलची हळद लावली़ संतोष देशमुख यांना २० एकर शेती जमीन आहे़ यामध्ये त्यांनी पारंपारिक पिकेही घेतली़ पारंपरिक पिकातून त्यांना चांगले उत्पन्न झाले़ दोन एकरमध्ये तूर तर काही ठिकाणी कापूस लावला़ मात्र दुष्काळामुळे जास्त उत्पन्न हाती आले नाही़ केवळ हळदीच्या पिकाने जीवनदान दिले़हळदीची लागवड करण्यासाठी त्यांना ३ लाख रुपयांचा खर्च झाला़ संतोष देशमुख यांनी दुष्काळी परिस्थितीत कापूस, मूग, तूर हे पीक लावून पाहिले़ परंतु, या पिकामुळे उत्पन्न तर आलेच नाही़ काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागले़ अशा स्थितीत डगमगून न जाता त्यांनी हळदीची लागवड करण्याचा निर्णय घेतला़ पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पीक बहरात आले़ परिसरात असलेल्या निम्न दूधना डाव्या कालव्याला पाणी आल्यामुळे पीक वाढण्यास मदत झाली, असे त्यांनी सांगितले़ मागील आठ महिन्यांपूर्वी केलेल्या हळदीच्या पिकाच्या प्रयोगामुळे आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत झाल्याची माहिती संतोष देशमुख यांनी दिली़ हळदीचे पीक लागवड केल्यानंतर कमी पाण्यावर पीक वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले़ यावेळी जिद्द व मेहनतीच्या बळावर पीक वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले़ पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे बेड पद्धतीद्वारे पीक बहरात आले़ शेतकऱ्यांनी खचून न जाता, आहे त्या परिस्थितीत शेतामध्ये प्रयोग करावेत़-संतोष देशमुख