शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

वारकऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:05 IST

विहिंपचा आरोप : लसीचे दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांनाच वारीत प्रवेश द्या औरंगाबाद : संपूर्ण देशात लसीकरण ...

विहिंपचा आरोप : लसीचे दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांनाच वारीत प्रवेश द्या

औरंगाबाद : संपूर्ण देशात लसीकरण सुरु आहे. जनजीवन सुरळीत होत आहे. हजारो लोक रस्त्यावर बिनधास्त वावरत आहेत. शेकडो लोकांच्या साक्षीने लग्नसोहळे पार पाडले जात आहेत. हॉटेल, माॅल्स, दारूची दुकाने सुरु आहेत; मात्र पंढरीच्या वारीवरच निर्बंध का? कोरोना नियमाच्या अडून वारकऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री अनंत पांडे यांनी केला.

पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत संपर्क प्रमुख हभप जनार्दन मेटे महाराज यांनी सांगितले की, पंढरीच्या वारीची ७५० वर्षांची परंपरा आहे. यंदा संत तुकाराम महाराजांच्या ३६० वा पालखी सोहळा आहे. मानाच्या प्रत्येक वारीसोबत किमान ५०० जणांना पायी वारीची परवानगी द्यावी. ज्या वारकऱ्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आणि ज्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आहे, अशांनाच परवानगी द्यावी. कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी वारकरी गावाऐवजी माळरानात मुक्काम करतील, परवानगी दिल्यानंतर वारकरी शिस्त पाळणार नाहीत अशी शंका असेल तर राज्याने केंद्रीय फोर्स मागवावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी हभप अण्णा देशटवार, हभप जनार्दन महाराज, प्रांत सहमंत्री रामदास लहाबर, राजीव जहागिरदार यांची उपस्थिती होती.