शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

वारकऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:05 IST

विहिंपचा आरोप : लसीचे दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांनाच वारीत प्रवेश द्या औरंगाबाद : संपूर्ण देशात लसीकरण ...

विहिंपचा आरोप : लसीचे दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांनाच वारीत प्रवेश द्या

औरंगाबाद : संपूर्ण देशात लसीकरण सुरु आहे. जनजीवन सुरळीत होत आहे. हजारो लोक रस्त्यावर बिनधास्त वावरत आहेत. शेकडो लोकांच्या साक्षीने लग्नसोहळे पार पाडले जात आहेत. हॉटेल, माॅल्स, दारूची दुकाने सुरु आहेत; मात्र पंढरीच्या वारीवरच निर्बंध का? कोरोना नियमाच्या अडून वारकऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री अनंत पांडे यांनी केला.

पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत संपर्क प्रमुख हभप जनार्दन मेटे महाराज यांनी सांगितले की, पंढरीच्या वारीची ७५० वर्षांची परंपरा आहे. यंदा संत तुकाराम महाराजांच्या ३६० वा पालखी सोहळा आहे. मानाच्या प्रत्येक वारीसोबत किमान ५०० जणांना पायी वारीची परवानगी द्यावी. ज्या वारकऱ्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आणि ज्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आहे, अशांनाच परवानगी द्यावी. कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी वारकरी गावाऐवजी माळरानात मुक्काम करतील, परवानगी दिल्यानंतर वारकरी शिस्त पाळणार नाहीत अशी शंका असेल तर राज्याने केंद्रीय फोर्स मागवावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी हभप अण्णा देशटवार, हभप जनार्दन महाराज, प्रांत सहमंत्री रामदास लहाबर, राजीव जहागिरदार यांची उपस्थिती होती.