शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निम्मे स्टील कारखाने बंद!

By admin | Updated: August 9, 2014 00:26 IST

जालना: येथील स्टिल उद्योग कमालीचा अडचणीत सापडला

जालना: परदेशातून आयात होणाऱ्या स्टिलसह घसरलेले भाव व वीज तसेच पाण्याच्या कमतरतेमुळेच येथील स्टिल उद्योग कमालीचा अडचणीत सापडला असून, निम्मे कारखाने ठप्प तर निम्मे कारखाने एकाच पाळीत उत्पादन घेत आहेत. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ५५ सळईचे कारखाने आहेत. हे कारखाने प्रतिकूल परिस्थितीत काही दिवसांपर्यंत सुरु होते. परंतु आता आयात केलेल्या स्टिलसह १० हजार रुपये प्रतिटनापर्यंत घसरलेल्या भावामुळे निम्मे कारखाने बंद पडले आहेत. जे कारखाने चालविले जाताहेत त्यांच्या दोन पाळ्या बंद आहेत. केवळ एकाच पाळीत उत्पादन सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातून उद्योजक कसबसे सावरले. आता उद्योग सावरण्याची वेळ आली असतांना विदेशातून सळई दाखल झाली आहे. त्याचे विपरित परिणाम स्थानिक उद्योगावर होणार आहेत. विशेषत: कामगार वर्ग बेकार होईल अशी भीती आहे. कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक वाया जाण्याची काही उद्योजकांनी भीती व्यक्त केली.सळई उद्योगावर आधारित अन्य पूरक उद्योगही बंद होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम बँकांसह अन्य व्यवसायावर उमटणार आहे. आर्थिकमंदीमुळे तसेच बाजारपेठेत सळईस मागणी नसल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातच आता आयातीचे धोरणसुद्धा या उद्योगास मारक ठरते आहे. चीनमधून मोठ्या प्रमाणात आलेल्या सळईने स्थानिक उद्योजकांसमोर प्रश्न निर्माण केले आहेत. वास्तविकता या मालाची गुणवत्ता तपासणी गरजेचे असल्याचे मत येथील उद्योजकांनी व्यक्त केले. तपासणी शिवाय त्या मालाच्या विक्रीस परवानगी देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. चीनमध्ये तयार करण्यात येणारे लोखंड हे केवळ भंगारापासून तयार केले जाते, असे स्थानिक उद्योजकांचे मत आहे. सळईची ताण व दबाव सहन करण्याची क्षमता. तसेच वरचा भाग टणक व आतील भाग मऊ असावा लागतो. त्यासाठी अ‍ॅसीडची प्रक्रीया करूनच तपासणी करावी लागते. चीनच्या सळईचा भाव कमी असला तरी त्यांच्या टिकाऊपणाची शाश्वती नाही, असेही मत काही उद्योजकांचे आहे. केंद्र सरकाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी अपेक्षाही उद्योजकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)आयातीचे धोरण चुकीचे असल्याचे उद्योजकांचे म्हणणे...उद्योजक सतीश अग्रवाल यांनी सांगितले, चीनहून ३ लाख टन सळई मद्रास बंदरात दाखल झाली आहे. येत्या दोन दिवसात ही सळई मुंबईत येईल. त्याचे दूरगामी परिणाम स्थानिक उद्योगांवर होतील.किशोर अग्रवाल म्हणाले, चीनप्रमाणे पायाभूत सुुविधा सरकारने दिल्यास सळई स्वस्त विकता येईल. सरकारद्वारे वीज, पाणी व कच्चा माल याचा विचार आतापर्यंत करण्यात आला नाही. दिनेश भारूका म्हणाले, चीनप्रमाणेच मुबलक व स्वस्त वीज देण्यासाठी शासनाने धोरण तयार करावे. स्थानिक उद्योजकांना स्पर्धेस तोंड देण्यासाठी सक्षम न करता विदेशी माल आणणे म्हणजे स्थानिक उद्योग बंद करून बेकारी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ४डी.बी. सोनी, सुरेंद्र पित्ती, नरेंद्र अग्रवाल, अरूण अग्रवाल, घनशाम गोयल या उद्योजकांनीही आयातीच्या धोरणाबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. केंद्र सरकारने आयातीचे धोरण थांबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.