शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

बाजार समितीतील खरेदी-विक्री निम्म्यावर !

By admin | Updated: November 10, 2016 00:05 IST

लातूर : गेल्या काही दिवसांपासून विक्रमी आवक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० आणि हजारच्या नोटा रद्दच्या निर्णयाचा फटका बसला.

लातूर : गेल्या काही दिवसांपासून विक्रमी आवक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० आणि हजारच्या नोटा रद्दच्या निर्णयाचा फटका बसला. एका दिवसात बाजार समितीतील सोयाबीन वगळता इतर धान्याची आवक निम्म्यावर आली तर आवक झालेल्या अर्ध्या मालाची खरेदी-विक्रीही झाली नाही. शेतकऱ्यांनी हजार-पाचशेच्या नोटा घेण्याला विरोध केला तर आडत्याकडे द्यायला शंभरच्या नोटाच उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे बाजार समितीतील उलाढाल ठप्प झाली. येत्या आठ दिवसात नवे चलन हाती येईपर्यंत ही अवस्था राहील, असे अध्यक्ष ललितभाई शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक वाढली होती. सोयाबीनची आवक प्रामुख्याने जास्त होती. बाजार समितीतील या गर्दीला हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे मात्र चांगलाच ब्रेक बसला. जोपर्यंत आडत्यांकडे नवे चलन येत नाही. तोपर्यंत हा ब्रेक राहणार आहे. बाजार समितीत सोयाबीनची आवक स्थिर राहिली. ३१ हजार ८७२ क्विंटल सोयाबीन बाजार समितीत आले. मात्र यातील अर्ध्याचीही खरेदी विक्री झाली नाही. गेल्या काही दिवसात सोयाबीनची आवक ४० हजार क्विंटलपर्यंत गेली होती. परंतु ती आता मंदावली आहे. इतर धान्याची आवक तर चांगलीच कमी झाली आहे. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहाराला ब्रेक बसले. आडत असोसिएशनचे अजिंक्य सोनवणे यांनी आवक समाधानकारक होती. परंतु रोख चलनाच्या कमतरतेमुळे व्यवहार मात्र पूर्ण होऊ शकले नाहीत. चार दिवसात व्यवहार रुळावर येतील, असे आडत असोसिएशनचे अजिंक्य सोनवणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तर सचिव मधुकर गुंजकर म्हणाले की, तांत्रिक बाब आहे. शासनाचा निर्णय हा चांगला असल्याने शेतकरी आणि आडत व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. फक्त यात सुसूत्रता येण्यासाठी सात आठ दिवसांचा कालावधी जाईल, असे सांगितले. तर माल घेऊन आलेले शेतकरी राम शिंदे म्हणाले की, विक्री झाल्यावर बाजार समितीत रोख पैसे मिळतातच. आम्ही गरीब माणसे. आम्हाला बँकेचे काय कळतय. आडत्या पैसे द्यायला नाहीत म्हटल्यावर हसू आले होते. पण सरकारचा निर्णय म्हंटल्यावर थांबू चार दिवस. (प्रतिनिधी)