शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीतील खरेदी-विक्री निम्म्यावर !

By admin | Updated: November 10, 2016 00:05 IST

लातूर : गेल्या काही दिवसांपासून विक्रमी आवक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० आणि हजारच्या नोटा रद्दच्या निर्णयाचा फटका बसला.

लातूर : गेल्या काही दिवसांपासून विक्रमी आवक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० आणि हजारच्या नोटा रद्दच्या निर्णयाचा फटका बसला. एका दिवसात बाजार समितीतील सोयाबीन वगळता इतर धान्याची आवक निम्म्यावर आली तर आवक झालेल्या अर्ध्या मालाची खरेदी-विक्रीही झाली नाही. शेतकऱ्यांनी हजार-पाचशेच्या नोटा घेण्याला विरोध केला तर आडत्याकडे द्यायला शंभरच्या नोटाच उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे बाजार समितीतील उलाढाल ठप्प झाली. येत्या आठ दिवसात नवे चलन हाती येईपर्यंत ही अवस्था राहील, असे अध्यक्ष ललितभाई शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक वाढली होती. सोयाबीनची आवक प्रामुख्याने जास्त होती. बाजार समितीतील या गर्दीला हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे मात्र चांगलाच ब्रेक बसला. जोपर्यंत आडत्यांकडे नवे चलन येत नाही. तोपर्यंत हा ब्रेक राहणार आहे. बाजार समितीत सोयाबीनची आवक स्थिर राहिली. ३१ हजार ८७२ क्विंटल सोयाबीन बाजार समितीत आले. मात्र यातील अर्ध्याचीही खरेदी विक्री झाली नाही. गेल्या काही दिवसात सोयाबीनची आवक ४० हजार क्विंटलपर्यंत गेली होती. परंतु ती आता मंदावली आहे. इतर धान्याची आवक तर चांगलीच कमी झाली आहे. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहाराला ब्रेक बसले. आडत असोसिएशनचे अजिंक्य सोनवणे यांनी आवक समाधानकारक होती. परंतु रोख चलनाच्या कमतरतेमुळे व्यवहार मात्र पूर्ण होऊ शकले नाहीत. चार दिवसात व्यवहार रुळावर येतील, असे आडत असोसिएशनचे अजिंक्य सोनवणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तर सचिव मधुकर गुंजकर म्हणाले की, तांत्रिक बाब आहे. शासनाचा निर्णय हा चांगला असल्याने शेतकरी आणि आडत व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. फक्त यात सुसूत्रता येण्यासाठी सात आठ दिवसांचा कालावधी जाईल, असे सांगितले. तर माल घेऊन आलेले शेतकरी राम शिंदे म्हणाले की, विक्री झाल्यावर बाजार समितीत रोख पैसे मिळतातच. आम्ही गरीब माणसे. आम्हाला बँकेचे काय कळतय. आडत्या पैसे द्यायला नाहीत म्हटल्यावर हसू आले होते. पण सरकारचा निर्णय म्हंटल्यावर थांबू चार दिवस. (प्रतिनिधी)