शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

पाच लाख शेतकऱ्यांचा पीकविमा अडविला

By admin | Updated: May 8, 2015 00:25 IST

जालना : जिल्ह्यात गतवर्षी खरीप पेरणीच्या वेळी ४ लाख ९६ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. मात्र दुष्काळी परिस्थितीतही या पीकविम्याचे कवच त्यांना मिळाले नाही

जालना : जिल्ह्यात गतवर्षी खरीप पेरणीच्या वेळी ४ लाख ९६ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. मात्र दुष्काळी परिस्थितीतही या पीकविम्याचे कवच त्यांना मिळाले नाही. येत्या आठ दिवसात शासनाने पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यास १६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी दिला आहे.शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलताना आ. टोपे म्हणाले की, मागील वर्षी शेतकऱ्यांनी पीकविम्यापोटी ११ कोटी ९६ लाख रुपयांचा भरला. त्याचे विमा कवच ४०४ कोटी रूपये एवढे आहे. पीकविम्याची रक्कम अ‍ॅग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविण्यात आली. मात्र दुष्काळी परिस्थितीत शासनाने या विम्यापोटी एक पैसाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. पैसे देण्यास शासन दिरंगाई करत असल्याचा आरोप आ. टोपे यांनी केला.शेतकऱ्यांना कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन या खरीप पिकांसाठी पीक विमा भरला जातो. या पीकविम्याचे पैसे येत्या आठ दिवसात न दिल्यास मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आ. टोपे यांनी सांगितले. २०१३-१४ मध्येही दुष्काळ होता. त्यावेळी २०१३-१४ मध्ये जो पीकविमा मिळाला, तो ७७ कोटी रुपयांचा होता. त्यावेळी आपण पालकमंत्री असताना आपण सतत पाठपुरावा करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले, असेही आ. टोपे म्हणाले. दुष्काळ, गारपिटीचे अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही पूर्णपणे वाटप झालेले नाही. ८० कोटी रुपये अद्याप वाटपाचे बाकी असल्याचे सांगून आ. टोपे म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यावेळी राकाँचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जि.प. सदस्य सतीश टोपे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)जल्ह्यात ७५ टक्के शेतकरी पीककर्ज विना असल्याचा आरोप यावेळी आ. टोपे यांनी केला. त्यासाठी उद्दिष्ट वाढविणे गरजेचे आहे. काही बँकांच्या व्यवस्थापकांनी दलालांमार्फत आलेली कर्जप्रकरणेच मंजूर केली. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर देखील त्यांचे निवारण होत नाही, असेही टोपे म्हणाले. जिल्ह्यात निकृष्ट दर्जाची बियाणे मोठ्या प्रमाणावर विक्री केली जातात. हा प्रकार रोखण्यासाठी गुणनियंत्रण समितीकडून समाधानकारक काम केले जात नाही, अशी टिकाही आ. टोपे यांनी केली.अनेक गावांमध्ये जळालेले ट्रान्सफार्मर अद्यापही बदलून दिलेले नाही. २१ कोटी रुपयांचे ठिबक अनुदान दोन वर्षांपासून अद्याप वाटप झालेले नाही. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळत नाही, अशी खंतही आ. टोपे यांनी व्यक्त केली.