शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

निम्म्या एटीएमचे ‘शटर डाऊन’!

By admin | Updated: December 29, 2016 22:53 IST

बीड पाचशे- हजार रुपयांच्या नोटा रद्दचा निर्णय होऊन ४८ दिवस उलटल्यानंतरही जिल्ह्यातील चलनटंचाई दूर झालेली नाही.

संजय तिपाले  बीडपाचशे- हजार रुपयांच्या नोटा रद्दचा निर्णय होऊन ४८ दिवस उलटल्यानंतरही जिल्ह्यातील चलनटंचाई दूर झालेली नाही. शहरातील निम्म्या एटीएममध्ये खडखडाट कायम आहे. डझनभर एटीएमचे शटर चोवीस तास ‘डाऊन’च असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे. तथापि, आतापर्यंत पाचशे, हजार रुपयांच्या १२०९ कोटी रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्या असून ११० कोटी रुपयांच्या नव्या नोटा दाखल झाल्या आहेत. त्यापैकी केवळ २५० कोटी रुपये आतापर्यंत बँकेतून ‘विड्रॉल’ झाले आहेत.नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून आतापर्यंत चलनटंचाईत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्याचा फटका बाजारपेठेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. मोठे व्यवहार तर दूरच;पण साधे किराणा सामान खरेदी करायचे म्हटले तरी वांधे निर्माण झाले आहेत. दरम्यान, नागरिकांना सुरुवातीला नोटाबंदलीसाठी बँकेच्या रांगेत थांबावे लागले होते. एटीएम व आॅनलाईन बँकिंग सुविधा नसलेल्यांची तर अधिकच अडचण झाली. त्यांना खात्यातील हक्काचा पैसा मिळविण्यासाठी रांगेत उभे रहावे लागले. एटीएम सुविधा असलेल्यांचीही याहून वेगळी स्थिती नव्हती. शहरातील १० ते १२ एटीएम ४८ दिवसांत एकदाही उघडले नसल्याची नवीन माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे काही एटीएममध्ये पैशांचा भरणा होत आहे;परंतु तेथेही पैसे काढण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत आहे. परिणामी एटीएम यंत्रात पैसे भरल्यानंतर ते अवघे सहा तासांत संपत आहेत. त्यामुळे लांबलचक रांगेत उभे राहूनही पैसे मिळतील की नाही, याची शाश्वती नाही. दहा दिवसांपूर्वी सलग तीन सुट्यांमध्ये तर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बँका बंद.. एटीएममध्ये खडखडाट... त्यामुळे चाकरमान्यांना सुट्यांचा आनंदही उपभोगता आला नाही. अनेकांची सुटी पैशांची जुळवाजुळव करण्यातच गेली.नोटबंदीच्या निर्णय होऊन ४८ दिवस उलटले तरीही एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध नाही. त्यामुळे सामान्यांची अडचण कायम असून हातात कार्ड घेऊन त्यांना पैशांसाठी वेगवेगळ्या एटीएमवर खेटे मारावे लागत आहेत. जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अनेकांची लगबग सुरू आहे.