शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेकरूंचा प्रवास येत्या ७ सप्टेंबरपासून

By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST

औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रेला जाण्याची इच्छा प्रत्येक मुस्लिम बांधवाला होत असते. इस्लाममधील पाच अत्यावश्यक बाबींमध्ये हज यात्रेला

औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रेला जाण्याची इच्छा प्रत्येक मुस्लिम बांधवाला होत असते. इस्लाममधील पाच अत्यावश्यक बाबींमध्ये हज यात्रेला स्थान देण्यात आले असल्याने दरवर्षी हज यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज प्राप्त होतात. यंदा मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील २ हजार ४०० यात्रेकरू जाणार आहेत. ७ सप्टेंबरपासून ही यात्रा सुरू होईल.सौदी अरेबिया सरकारने यंदा भारताच्या कोट्यात २० टक्के कपात केली आहे. त्यामुळे यात्रेकरूंची संख्याही झपाट्याने घटली आहे. मागील वर्षी मराठवाड्यातून ३ हजार ३०९ यात्रेकरू हज यात्रेला गेले होते. यंदा २ हजार ४०० यात्रेकरूंनाच संधी मिळाली आहे. यात्रेकरूंसाठी एकूण पाच प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आले. शेवटचे शिबीर ९ आणि १० आॅगस्ट रोजी जामा मशीद येथे पार पडले. या शिबिरात तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले. हज यात्रेतील प्रवास, ‘अहेराम-उमरा’, हजच्या प्रक्रियेतील पाच दिवस, मदिना येथील धार्मिक विधीसंदर्भात माहिती देण्यात आल्याचे मरकज- ए- खिदमात हुज्जाज कमिटीचे करीम पटेल यांनी सांगितले. शिबिरासाठी जालना, बीड, परभणी, बुलडाणा, अहमदनगर, जळगाव, नांदेड येथून १८०० पेक्षा अधिक भाविक उपस्थित होते.सोमवार ११ आॅगस्टपासून सर्व यात्रेकरूंना मेंदूज्वरची लस देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आज पहिल्याच दिवशी ३६० यात्रेकरूंना लस देण्यात आली. जामा मशीद परिसरातील इमाम हॉल येथे लसीकरण सुरू असून, १३ आॅगस्टपर्यंत दररोज सकाळी ९ ते १२ वाजेदरम्यान लस देण्यात येणार आहे. यात्रेकरूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.७ सप्टेंबरपासून मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील यात्रेकरू चिकलठाणा विमानतळावरून पवित्र हज यात्रेला रवाना होतील. दररोज २४० यात्रेकरू रवाना होणार असून, १६ सप्टेंबरपर्यंत दररोज एक विमान सुरू राहणार आहे. १८ आॅक्टोबरपासून हज यात्रेकरूंच्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे करीम पटेल यांनी नमूद केले.