शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गारपीट मदत वाटपात घोटाळा

By admin | Updated: June 19, 2014 23:57 IST

रमेश शिंदे , औसा तालुक्यात गारपीठग्रस्त शेतकऱ्यांना वाटप झालेल्या अनुदानात अनेक गैरप्रकार आता उघड होत आहेत़

रमेश शिंदे , औसातालुक्यात गारपीठग्रस्त शेतकऱ्यांना वाटप झालेल्या अनुदानात अनेक गैरप्रकार आता उघड होत आहेत़ कधी तलाठी नजर चुकीने नाव लागल्याचे तहसीलदारांना पत्र देतात़ तर कधी शेती कमी अनुदान जास्त असे प्रकार समोर येत आहेत़ औसा शिवारातील तीन शेतकऱ्यांना शेतात पिकच नसताना बनावट नोंदी करून मोठा आर्थिक लाभ घेतला असल्याची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली़ तर उपविभागीय अधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्यांची चौकशी करून गैरप्रकार झाले असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत़ औसा तालुक्यात फेबु्रवारी अखेर व मार्चच्या पहिल्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली़ यामध्ये शेतकऱ्यांच्या फळबागा व रबी हंगामाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते़ शासनाने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक या तिघांच्या पथकाद्वारे संयुक्त पंचनामे केले व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली़ नुकसानभरपाईचे वाटप सुरू असताना आता अनेक गैरप्रकार पुढे येत आहेत़ कमी क्षेत्र असणाऱ्यांना जास्तीची नुकसानभरपाई, ज्यांचे प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांना लाभ कमी, असे प्रकार आता उघड होऊ लागले आहेत़ या सदंर्भात तक्रारींचा ओघही वाढत आहे़ तहसील कार्यालयात, असे हजारापेक्षा अधिक अर्ज आल्याचे सांगण्यात आले़ औसा शिवारातील सर्वे नंबर ३३२ मधील तीन शेतकऱ्यांना प्रत्येकी ४० हजार नुकसानभरपाई देण्यात आली आहे़ या तीनही शेतकऱ्यांचे क्षेत्र बागायती नाही किंवा त्यांच्या शेतामध्ये पाण्याचा स्त्रोतही नाही़ त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळाला तर त्यांच्या आजुबाजुच्या बागायती शेतकऱ्यांना मात्र अल्प प्रमाणात लाभ देण्यात आला आहे़ याची चौकशी करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती़औसा रेणापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी २८ मे रोजी औसा येथील तहसीलदारांना पत्र दिले असून, सर्वे नं़ ३३२ मधील त्या तीन शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी व गैरप्रकार आढळल्यास फौजदारी कार्यवाही करावी तसेच त्याचा अहवाल द्यावा, असे या पत्रात म्हटले आहे़ चौकशीनंतर दोषींवर कारवाई़़़यासंदर्भात तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की सध्या पदवीधर निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी अद्याप पूर्ण झाली नाही़ चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, असे भारस्कर म्हणाले़