शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गुरूजी येतील तेव्हाच भरते शाळा

By admin | Updated: August 27, 2014 01:35 IST

राउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील शिक्षकांनी शाळेच्या वेळेलाच बगल दिला आहे. त्यामुळे शिक्षक येईल त्याच वेळेवर शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

राउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील शिक्षकांनी शाळेच्या वेळेलाच बगल दिला आहे. त्यामुळे शिक्षक येईल त्याच वेळेवर शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.तळेगाव येथील जि. प. शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. या शैक्षणिक वर्षापासून आठव्या वर्गाला मान्यता मिळालेली आहे. या आठ वर्गांसाठी शाळेत फक्त सहाच शिक्षक आहेत. मात्र काही शिक्षक अप-डाऊन करीत असल्याने शाळेत वेळेवर येत नाहीत. परिणामी शाळा वेळेवर भरत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षकांची वाट पाहत बसावे लागते. शिक्षक वेळेवर येत नसल्याने विद्यार्थी शाळा सोडून बाहेर खेळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.शिक्षकांनी शाळेत वेळेवर येणे गरजेचे असताना ते वेळेवर येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देवून उशिराने येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.शाळेचे मुख्याध्यापकही वारंवार गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेले प्रवेश निर्गमचा उतारा वेळेवर मिळत नाही. त्यासाठी पालकांना शाळेत खेटा माराव्या लागत आहे. (वार्ताहर)या संबंधी घनसावंगी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विपूल भागवत म्हणाले की, शिक्षकांच्या उशिरा येण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित शाळांची विस्तार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार असल्याचे सांगितले.४शाळेच्या मैदानावर व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे. याकडेही शाळेने लक्ष देवून परिसरात स्वच्छता करावी असी मागणी होत आहे.