शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

गुरूपिंपरी येथे जलयुक्तच्या कामांत अपहार!

By admin | Updated: December 27, 2016 00:05 IST

जालना : घनसावंगी तालुक्यातील गुरूपिंपरी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी विभागाने पूर्ण केलेल्या कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला

जालना : घनसावंगी तालुक्यातील गुरूपिंपरी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी विभागाने पूर्ण केलेल्या कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, तालुका कृषी अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सचिन अरविंद कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, कम्पार्ट बडींगची कामे न करता बोगस बिले तयार करून आर्थिक अपहार करण्यात आला आहे. यात सर्व्हे क्रमांक ३७९, ३८१, ४००, ३७४, ३६६ मध्ये कामे न करताच बिले उचलण्यात आली. तालुक्यात जेसीबीऐवजी ट्रॅक्टरने बांधाची कामे करण्यात आली आहेत. जेसीबी मशीनने चर खोदणे आवश्यक आहे. त्यात चराची रूंदी २. १५ मीटर खोली दीड फुट असेण आवश्यक आहे. ही कामे ट्रॅक्टरद्वारे करण्यात आली आहेत. बांधांना आकार देण्यात आलेला नाही. यासाठी अंदाजपत्रकात मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. परंतु ही कामे न करताच मोजमाप पुस्तिकेत खोट्या नोंदी करून बिले उचलून आर्थिक अपहार केला आहे. अंदाजपत्रकात तीन पाईची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कोठेही काम करण्यात आलेले नाही. बांधाचा टॉप मेंटन करताना खोट्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. बांधाची लांबी व रूंदी यात तफावत आढळते. सातबारावरील क्षेत्रातही फरक आहे. अनेक कामे निविदान न देताच करण्यात आली आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कोल्हे यांनी जलयुक्त कामांच्या १६ बाबींमध्ये मोठे दोष काढून भ्रष्टाचार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)