शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

गुरूपिंपरी येथे जलयुक्तच्या कामांत अपहार!

By admin | Updated: December 27, 2016 00:05 IST

जालना : घनसावंगी तालुक्यातील गुरूपिंपरी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी विभागाने पूर्ण केलेल्या कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला

जालना : घनसावंगी तालुक्यातील गुरूपिंपरी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी विभागाने पूर्ण केलेल्या कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, तालुका कृषी अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सचिन अरविंद कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, कम्पार्ट बडींगची कामे न करता बोगस बिले तयार करून आर्थिक अपहार करण्यात आला आहे. यात सर्व्हे क्रमांक ३७९, ३८१, ४००, ३७४, ३६६ मध्ये कामे न करताच बिले उचलण्यात आली. तालुक्यात जेसीबीऐवजी ट्रॅक्टरने बांधाची कामे करण्यात आली आहेत. जेसीबी मशीनने चर खोदणे आवश्यक आहे. त्यात चराची रूंदी २. १५ मीटर खोली दीड फुट असेण आवश्यक आहे. ही कामे ट्रॅक्टरद्वारे करण्यात आली आहेत. बांधांना आकार देण्यात आलेला नाही. यासाठी अंदाजपत्रकात मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. परंतु ही कामे न करताच मोजमाप पुस्तिकेत खोट्या नोंदी करून बिले उचलून आर्थिक अपहार केला आहे. अंदाजपत्रकात तीन पाईची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कोठेही काम करण्यात आलेले नाही. बांधाचा टॉप मेंटन करताना खोट्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. बांधाची लांबी व रूंदी यात तफावत आढळते. सातबारावरील क्षेत्रातही फरक आहे. अनेक कामे निविदान न देताच करण्यात आली आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कोल्हे यांनी जलयुक्त कामांच्या १६ बाबींमध्ये मोठे दोष काढून भ्रष्टाचार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)