शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

‘पक्षप्रवेशाचा निर्णय पालकमंत्री घेतील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:11 IST

आ.धोंडे यांनी विकास कामांकडे लक्ष द्यावे, आमच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दात राजकीय टोला माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी आ.धोंडेंना लगावला.

गणेश दळवी।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मला पक्षात घ्यायचं की नाही, या बाबत मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी काळजी करण्याची गरज नाही. कारण मी त्यांना विचारून पक्षात आलो नाही आणि येथून पुढेही विचारणार नाही. माझा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे हे घेतील. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे आ.धोंडे यांनी विकास कामांकडे लक्ष द्यावे, आमच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दात राजकीय टोला माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी आ.धोंडेंना लगावला.आष्टीत धस यांच्या निवासस्थानी सुरेश धस गटाच्या वतीने मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार तसेच दिवाळी फराळाचा कार्यक्रम रविवारी झाला. त्यावेळी सुरेश धस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूरचे नगराध्यक्ष रोहिदास गाडे हे होते. व्यासपीठावर आष्टीचे नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, बळीराम पोटे, दशरथ वनवे, तात्यासाहेब हुले यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच उपस्थित होते.धस म्हणाले, या मतदारसंघात १६३ पैकी ८५ ग्रामपंचायतींवर धस गटाने झेंडा फडकविला आहे. परंतु मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.भिमराव धोंडे यांनी चार दिवसांपूर्वी आपल्या ताब्यात १०३ ग्रामपंचायत असल्याचे जाहिर केले. त्याबद्दल आपल्याला काहीही घेणे देणे नाही. परंतु मी ग्रामपंचायत निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा फोटो वापरला व माझा भाजप प्रवेश मतदार संघातील जनता नको म्हणत असल्याचा आरोप केला होता. धोंडे साहेब, मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय तुम्हाला विचारुन घेतला नाही, घेणार नाही आणि येथून पुढेही विचारणार नाही. मला तुमच्या वकिलीची गरज नाही. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले.मला जे काही बोलायचे ते पालकमंत्री, मुख्यमंत्री यांना बोललो आहे, असेही धस म्हणाले. मतदार संघातील कामांकडे लक्ष दिले तर काहीतरी विकास होईल, असा टोलाही त्यांनी आ.धोंडे यांना लगावला. धोंडे साहेब, तुम्ही माझ्यावर आमदार फंड वाटपात टक्केवारी घेतल्याचा आरोप केला. त्याचे उत्तर मी तुम्हाला दिलेच. परंतु तुम्ही एवढ्या दिवसात सुतगिरणी चालू करू शकले नाहीत. मात्र बांधकामासाठी दरवर्षी निधी मोठ्या प्रमाणावर घेतात. कडा साखर कारखान्याचं कुणी वाटोळं केले आहे, हे सर्व जनतेला माहित असल्याचे ते म्हणाले. प्रस्ताविक डॉ. दीपक भवर, सुत्रसंचालन माऊली जरांगे यांनी केले.