शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

वानरांच्या टोळीचा गेवराई शहरात धुमाकूळ

By admin | Updated: May 24, 2014 00:53 IST

गेवराई: पाण्याच्या शोधात गेवराई शहरात आलेल्या वानरांच्या टोळीने व्यावसायिकांसह नागरिक हैराण झाले आहेत.

गेवराई: पाण्याच्या शोधात गेवराई शहरात आलेल्या वानरांच्या टोळीने व्यावसायिकांसह नागरिक हैराण झाले आहेत. महिला, लहानमुलांना वानरांच्या टोळीची भितीही वाटत आहे. ग्रामीण भागात सध्या नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या विहिरीही आटल्या असल्याने ते पिकांना पाणीही सोडत नाहीत. यामुळे ग्रामीण भागात वानरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात असलेले दहा ते बारा वानरांची टोळी शुक्रवारी गेवराई शहरात आली. या टोळीतील वानरे नागरिकांच्या घरावरून उड्या मारत आहेत. तसेच घरासमोरील रांजण, माठातील तसेच इतर भांड्यातील पाणीही पित आहेत. अचानक घरात वानर आल्याने कुटुंबियात भीती पसरत आहे. वानरांच्या टोळीने शिवाजी चौक, सावतानगर, संजयनगर, गजानन नगर, शास्त्री चौक येथील नागरिकांना हैराण केले आहे. वानरे हॉटेलच्या पत्र्यावर उघड्या मारत असल्याने व्यापारीही त्रस्त झाले आहेत. वानरे अनेकदा फळ विक्रेत्यांच्या गाड्यावरील फळावरही ताव मारतात. यामुळे व्यापार्‍यांचे नुकसान होत आहे. यामुळे वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मनोज जयस्वाल, उमेश मानधने, महावीर मडकर, गणेश नेवाळे यांनी केली आहे. (वार्ताहर)