शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

सातारा-देवळाईत भूजल पातळी २५ टक्क्याने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:06 IST

औरंगाबाद: सातारा-देवळाई परिसर १२ महिने टँकरच्या पाण्यावर विसंबून असतो. यंदा जोरदार पाऊस झाल्याने या परिसरातील भूजल पातळी २५ टक्क्याने ...

औरंगाबाद: सातारा-देवळाई परिसर १२ महिने टँकरच्या पाण्यावर विसंबून असतो. यंदा जोरदार पाऊस झाल्याने या परिसरातील भूजल पातळी २५ टक्क्याने वाढली आहे. सातारा-देवळाईत यंदा जुलैपासूनच टँकरच्या फेऱ्या कमी झाल्या. सप्टेंबरमध्ये तर पावसाचे पाणी कॉलन्यात शिरले व परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले. परंतु दररोज खिशाला न परवडणाऱ्या भुर्दंडापासून सुटका मिळालेली आहे.

पुनर्भरणाचे महत्त्व कळले

परिसरात पाणी आडवा पाणी जिरवा ही सिंचनाची कामे देखील राबविण्यात आलेली आहे. कॉलनी व बंगला तसेच कॉम्प्लेक्सचे पावसात वाहून जाणारे पाणी बोअरवेलमध्ये पुनर्भरण केलेले आहे. कारण सातारा-देवळाईत पाण्याचे महत्त्व नागरिकांना पटलेले आहे. त्यामुळे टँकरच्या फेऱ्या कमी झालेल्या आहेत.- अशोकराव तिनगोटे

पाणी जपूनच वापरा

१२ महिने परिसराला टँकरमुक्ती नाही, अशीच गणिते जुळविली जातात. परंतु यंदा पावसामुळे वॉटर लेव्हल २५ टक्क्याने वाढलेली आहे. त्या पाण्याचा गैरवापर टाळावा, भविष्यात ते तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे.

- डॉ. प्रशांत अवसरमल

आकडेवारी घेणे सुरू

पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शहरात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. सातारा-देवळाईच्या बाजूला असलेल्या डोंगर असून, बहुतांश ठिकाणी पाणी अडविलेले आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झालेली आहे. चार महिन्याला वॉटर लेव्हल घेतली जाते. त्यामुळे महिना अखेर निरीक्षणातून आकडे स्पष्ट होतील.

- बी. एस. मेश्राम, (उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा औरंगाबाद विभाग)