शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

वृक्ष लागवड ठरले जनावरांसाठी कुरण

By admin | Updated: July 15, 2016 00:54 IST

विष्णू गायकवाड , गढी दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवून जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील शासकीय विभागाने झाडे लावण्याच्या सक्त सूचना दिल्या

विष्णू गायकवाड , गढीदुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवून जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील शासकीय विभागाने झाडे लावण्याच्या सक्त सूचना दिल्या. त्यानुसार १ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात तालुकाभरात रोपांची लागवड झाली. मात्र, लावण्यात आलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी कोणी घेतली नाही. त्यामुळे ही लहान रोपटे जनावरांचा चारा ठरत आहे. एका अर्थाने या योजनेचा बोजवारा उडाला आहे.वनयुक्त शिवार योजना सुरू होण्यापूर्वी शासकीय पातळीवर मोठा गाजावाजा करण्यात आला. प्रत्येक शासकीय कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले गेले. १ ते ७ जुलै या कालावधीत वनयुक्त शिवार योजनेसाठीचा सप्ताह पार पडला. शासकीय कार्यालयांनी उद्दिष्टपूर्ती केली; परंतु मूळ मुद्दा होता तो लावण्यात आलेल्या वृक्ष संवर्धनाचा. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झाडे लावून सेल्फी काढत ती मुख्य कार्यालयाला पाठविली; परंतु आता अनेक ठिकाणी लावलेली रोपटी गायब झाली आहेत. काही ठिकाणी केवळ रोपट्याच्या काड्या उरल्या. झाडांची पाने शेळ्या-मेंढ्यांनी खाल्ली. त्यामुळे या उपक्रमाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे.झाडे लावल्यानंतर त्याची जबाबदारी एखाद्या कार्यालयीन कर्मचाऱ्यावर देणे आवश्यक होते, असे वाटप असले तरी प्रत्यक्षात ते होणे अवघड आहे; कारण शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या मुळातच कमी असते. सर्वसामान्यांची कामे अनेक वेळा चकरा मारूनही होत नाहीत. त्यातच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना लावण्यात आलेल्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली तर कार्यालयीन कामे ढेपाळतील. याशिवाय, झाडांना नियमित पाणी देणेही आवश्यक असते. पाणी दिले नाही तर रोप वाढणार कसे? हाही कळीचा मुद्दा ठरतो. केवळ वृक्ष लागवड करून जबाबदारी पूर्ण करण्यासाठीचा हा देखावा आहे काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे. लावण्यात आलेल्या झाडांना जनावरांपासून संरक्षण मिळावे यासाठी जाळ्या बसविणे उचित ठरते; परंतु हेही खर्चिक बाब असल्याने प्रत्यक्षात उतरणे अवघड आहे.