शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

वृक्ष लागवड ठरले जनावरांसाठी कुरण

By admin | Updated: July 15, 2016 00:54 IST

विष्णू गायकवाड , गढी दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवून जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील शासकीय विभागाने झाडे लावण्याच्या सक्त सूचना दिल्या

विष्णू गायकवाड , गढीदुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवून जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील शासकीय विभागाने झाडे लावण्याच्या सक्त सूचना दिल्या. त्यानुसार १ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात तालुकाभरात रोपांची लागवड झाली. मात्र, लावण्यात आलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी कोणी घेतली नाही. त्यामुळे ही लहान रोपटे जनावरांचा चारा ठरत आहे. एका अर्थाने या योजनेचा बोजवारा उडाला आहे.वनयुक्त शिवार योजना सुरू होण्यापूर्वी शासकीय पातळीवर मोठा गाजावाजा करण्यात आला. प्रत्येक शासकीय कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले गेले. १ ते ७ जुलै या कालावधीत वनयुक्त शिवार योजनेसाठीचा सप्ताह पार पडला. शासकीय कार्यालयांनी उद्दिष्टपूर्ती केली; परंतु मूळ मुद्दा होता तो लावण्यात आलेल्या वृक्ष संवर्धनाचा. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झाडे लावून सेल्फी काढत ती मुख्य कार्यालयाला पाठविली; परंतु आता अनेक ठिकाणी लावलेली रोपटी गायब झाली आहेत. काही ठिकाणी केवळ रोपट्याच्या काड्या उरल्या. झाडांची पाने शेळ्या-मेंढ्यांनी खाल्ली. त्यामुळे या उपक्रमाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे.झाडे लावल्यानंतर त्याची जबाबदारी एखाद्या कार्यालयीन कर्मचाऱ्यावर देणे आवश्यक होते, असे वाटप असले तरी प्रत्यक्षात ते होणे अवघड आहे; कारण शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या मुळातच कमी असते. सर्वसामान्यांची कामे अनेक वेळा चकरा मारूनही होत नाहीत. त्यातच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना लावण्यात आलेल्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली तर कार्यालयीन कामे ढेपाळतील. याशिवाय, झाडांना नियमित पाणी देणेही आवश्यक असते. पाणी दिले नाही तर रोप वाढणार कसे? हाही कळीचा मुद्दा ठरतो. केवळ वृक्ष लागवड करून जबाबदारी पूर्ण करण्यासाठीचा हा देखावा आहे काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे. लावण्यात आलेल्या झाडांना जनावरांपासून संरक्षण मिळावे यासाठी जाळ्या बसविणे उचित ठरते; परंतु हेही खर्चिक बाब असल्याने प्रत्यक्षात उतरणे अवघड आहे.