शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड ठरले जनावरांसाठी कुरण

By admin | Updated: July 15, 2016 00:54 IST

विष्णू गायकवाड , गढी दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवून जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील शासकीय विभागाने झाडे लावण्याच्या सक्त सूचना दिल्या

विष्णू गायकवाड , गढीदुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवून जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील शासकीय विभागाने झाडे लावण्याच्या सक्त सूचना दिल्या. त्यानुसार १ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात तालुकाभरात रोपांची लागवड झाली. मात्र, लावण्यात आलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी कोणी घेतली नाही. त्यामुळे ही लहान रोपटे जनावरांचा चारा ठरत आहे. एका अर्थाने या योजनेचा बोजवारा उडाला आहे.वनयुक्त शिवार योजना सुरू होण्यापूर्वी शासकीय पातळीवर मोठा गाजावाजा करण्यात आला. प्रत्येक शासकीय कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले गेले. १ ते ७ जुलै या कालावधीत वनयुक्त शिवार योजनेसाठीचा सप्ताह पार पडला. शासकीय कार्यालयांनी उद्दिष्टपूर्ती केली; परंतु मूळ मुद्दा होता तो लावण्यात आलेल्या वृक्ष संवर्धनाचा. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झाडे लावून सेल्फी काढत ती मुख्य कार्यालयाला पाठविली; परंतु आता अनेक ठिकाणी लावलेली रोपटी गायब झाली आहेत. काही ठिकाणी केवळ रोपट्याच्या काड्या उरल्या. झाडांची पाने शेळ्या-मेंढ्यांनी खाल्ली. त्यामुळे या उपक्रमाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे.झाडे लावल्यानंतर त्याची जबाबदारी एखाद्या कार्यालयीन कर्मचाऱ्यावर देणे आवश्यक होते, असे वाटप असले तरी प्रत्यक्षात ते होणे अवघड आहे; कारण शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या मुळातच कमी असते. सर्वसामान्यांची कामे अनेक वेळा चकरा मारूनही होत नाहीत. त्यातच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना लावण्यात आलेल्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली तर कार्यालयीन कामे ढेपाळतील. याशिवाय, झाडांना नियमित पाणी देणेही आवश्यक असते. पाणी दिले नाही तर रोप वाढणार कसे? हाही कळीचा मुद्दा ठरतो. केवळ वृक्ष लागवड करून जबाबदारी पूर्ण करण्यासाठीचा हा देखावा आहे काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे. लावण्यात आलेल्या झाडांना जनावरांपासून संरक्षण मिळावे यासाठी जाळ्या बसविणे उचित ठरते; परंतु हेही खर्चिक बाब असल्याने प्रत्यक्षात उतरणे अवघड आहे.