शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अनुदान वाटप धिम्या गतीने

By admin | Updated: March 15, 2016 01:16 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळी अनुदानाचा सरकारने मोठा गाजावाजा केला. मात्र वाटप धिम्या गतीने होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडदुष्काळी अनुदानाचा सरकारने मोठा गाजावाजा केला. मात्र वाटप धिम्या गतीने होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने वाटपाला विलंब होत असल्याबाबत बँकांकडे मनुष्यबळ अपुरे असल्याचा बाऊ केला आहे. दुष्काळी अनुदानाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातून बँकांकडे गेली असली तरी संबंधित बँकांमधून शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडण्यास विलंब होत आहे.बीड जिल्ह्यासाठी ५१ कोटी ५८ लाख ८ हजार एवढे अनुदान आले आहे, यापैकी ४९ कोटी ९० लाख ७ हजार ६१३ एवढे अनुदान बँकांकडे वर्ग झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून हे अनुदान वर्ग झाले असले तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही, ही वस्तूस्थिती आहे. शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी बँकांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने विलंब होत आहे. शेतकरी दुष्काळी अनुदानाच्या आशेने संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये चकरा मारीत आहेत; मात्र तेथे गेल्यानंतर बँक कर्मचारी अनुदान वाटपास अवधी असल्याचे सांगत आहेत.दरम्यान, जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही आपल्याच मागण्यांचे पडले आहे. सोमवारपासून त्यांनी सामूहिक रजा टाकल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावीच लागणार आहे.दीड कोटी निधी पडूनदुष्काळी अनुदानातील दीड कोटींवर रक्कम अद्यापपर्यंत संबंधित तहसील कार्यालयांना वर्ग झाली नसल्याचे सोमवारी समोर आले आहे. बीड जिल्ह्यात एकूण ९६ हजार ९८७ शेतकरी अनुदानाचे लाभार्थी आहेत.बीडमध्ये १०० टक्के वाटप११ तालुक्यांपैकी बीड तहसीलने १०० टक्के निधी बँकांकडे वर्ग केला आहे, असे अहवालात नमूद आहे. सध्या बँकांमधून वाटपही सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळते; मात्र तालुक्यातील १३ हजार ८३९ पैकी ५ हजारांवर शेतकऱ्यांना ९०० ते ११०० एवढीच रक्कम दुष्काळी अनुदानाची मिळाली असल्याचे चौसाळा येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान एक महिन्यापूर्वीच जिल्हा बँकेत जमा झाले आहे. मात्र, बँकांच्या अंतर्गत अडचणींमुळे निधीचे वाटप करणे शक्य होत नाही. शेतकरी रोज बँकेकडे दुष्काळी अनुदानासाठी चकरा मारतात. मात्र, बँक कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.४मागील आठवड्यात वाटप सुरळीत सुरू होते; मात्र सोमवारी जिल्हा बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण करून बँक बंद केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले व बँकेच्या दारालाच त्यांनी चपलांचा हार घालून आंदोलन केले.