शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

अनुदान वाटप धिम्या गतीने

By admin | Updated: March 15, 2016 01:16 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळी अनुदानाचा सरकारने मोठा गाजावाजा केला. मात्र वाटप धिम्या गतीने होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडदुष्काळी अनुदानाचा सरकारने मोठा गाजावाजा केला. मात्र वाटप धिम्या गतीने होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने वाटपाला विलंब होत असल्याबाबत बँकांकडे मनुष्यबळ अपुरे असल्याचा बाऊ केला आहे. दुष्काळी अनुदानाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातून बँकांकडे गेली असली तरी संबंधित बँकांमधून शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडण्यास विलंब होत आहे.बीड जिल्ह्यासाठी ५१ कोटी ५८ लाख ८ हजार एवढे अनुदान आले आहे, यापैकी ४९ कोटी ९० लाख ७ हजार ६१३ एवढे अनुदान बँकांकडे वर्ग झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून हे अनुदान वर्ग झाले असले तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही, ही वस्तूस्थिती आहे. शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी बँकांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने विलंब होत आहे. शेतकरी दुष्काळी अनुदानाच्या आशेने संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये चकरा मारीत आहेत; मात्र तेथे गेल्यानंतर बँक कर्मचारी अनुदान वाटपास अवधी असल्याचे सांगत आहेत.दरम्यान, जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही आपल्याच मागण्यांचे पडले आहे. सोमवारपासून त्यांनी सामूहिक रजा टाकल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावीच लागणार आहे.दीड कोटी निधी पडूनदुष्काळी अनुदानातील दीड कोटींवर रक्कम अद्यापपर्यंत संबंधित तहसील कार्यालयांना वर्ग झाली नसल्याचे सोमवारी समोर आले आहे. बीड जिल्ह्यात एकूण ९६ हजार ९८७ शेतकरी अनुदानाचे लाभार्थी आहेत.बीडमध्ये १०० टक्के वाटप११ तालुक्यांपैकी बीड तहसीलने १०० टक्के निधी बँकांकडे वर्ग केला आहे, असे अहवालात नमूद आहे. सध्या बँकांमधून वाटपही सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळते; मात्र तालुक्यातील १३ हजार ८३९ पैकी ५ हजारांवर शेतकऱ्यांना ९०० ते ११०० एवढीच रक्कम दुष्काळी अनुदानाची मिळाली असल्याचे चौसाळा येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान एक महिन्यापूर्वीच जिल्हा बँकेत जमा झाले आहे. मात्र, बँकांच्या अंतर्गत अडचणींमुळे निधीचे वाटप करणे शक्य होत नाही. शेतकरी रोज बँकेकडे दुष्काळी अनुदानासाठी चकरा मारतात. मात्र, बँक कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.४मागील आठवड्यात वाटप सुरळीत सुरू होते; मात्र सोमवारी जिल्हा बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण करून बँक बंद केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले व बँकेच्या दारालाच त्यांनी चपलांचा हार घालून आंदोलन केले.