शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान वाटप धिम्या गतीने

By admin | Updated: March 15, 2016 01:16 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळी अनुदानाचा सरकारने मोठा गाजावाजा केला. मात्र वाटप धिम्या गतीने होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडदुष्काळी अनुदानाचा सरकारने मोठा गाजावाजा केला. मात्र वाटप धिम्या गतीने होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने वाटपाला विलंब होत असल्याबाबत बँकांकडे मनुष्यबळ अपुरे असल्याचा बाऊ केला आहे. दुष्काळी अनुदानाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातून बँकांकडे गेली असली तरी संबंधित बँकांमधून शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडण्यास विलंब होत आहे.बीड जिल्ह्यासाठी ५१ कोटी ५८ लाख ८ हजार एवढे अनुदान आले आहे, यापैकी ४९ कोटी ९० लाख ७ हजार ६१३ एवढे अनुदान बँकांकडे वर्ग झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून हे अनुदान वर्ग झाले असले तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही, ही वस्तूस्थिती आहे. शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी बँकांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने विलंब होत आहे. शेतकरी दुष्काळी अनुदानाच्या आशेने संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये चकरा मारीत आहेत; मात्र तेथे गेल्यानंतर बँक कर्मचारी अनुदान वाटपास अवधी असल्याचे सांगत आहेत.दरम्यान, जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही आपल्याच मागण्यांचे पडले आहे. सोमवारपासून त्यांनी सामूहिक रजा टाकल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावीच लागणार आहे.दीड कोटी निधी पडूनदुष्काळी अनुदानातील दीड कोटींवर रक्कम अद्यापपर्यंत संबंधित तहसील कार्यालयांना वर्ग झाली नसल्याचे सोमवारी समोर आले आहे. बीड जिल्ह्यात एकूण ९६ हजार ९८७ शेतकरी अनुदानाचे लाभार्थी आहेत.बीडमध्ये १०० टक्के वाटप११ तालुक्यांपैकी बीड तहसीलने १०० टक्के निधी बँकांकडे वर्ग केला आहे, असे अहवालात नमूद आहे. सध्या बँकांमधून वाटपही सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळते; मात्र तालुक्यातील १३ हजार ८३९ पैकी ५ हजारांवर शेतकऱ्यांना ९०० ते ११०० एवढीच रक्कम दुष्काळी अनुदानाची मिळाली असल्याचे चौसाळा येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान एक महिन्यापूर्वीच जिल्हा बँकेत जमा झाले आहे. मात्र, बँकांच्या अंतर्गत अडचणींमुळे निधीचे वाटप करणे शक्य होत नाही. शेतकरी रोज बँकेकडे दुष्काळी अनुदानासाठी चकरा मारतात. मात्र, बँक कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.४मागील आठवड्यात वाटप सुरळीत सुरू होते; मात्र सोमवारी जिल्हा बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण करून बँक बंद केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले व बँकेच्या दारालाच त्यांनी चपलांचा हार घालून आंदोलन केले.