शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

हरभरा हमी भाव खरेदी केंद्र बंद !

By admin | Updated: May 17, 2014 00:17 IST

लोहारा : शेतकर्‍यांची आर्थिक लूट होऊ नये, या उद्देशाने येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

लोहारा : शेतकर्‍यांची आर्थिक लूट होऊ नये, या उद्देशाने येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. येथे चांगला दर मिळत असल्याने शेतकरी या केंद्रावरच माल घालत होते. परंतु, १० मे पासून खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. पर्याय नसल्याने शेतकरी हा माल आता खाजगी व्यापार्‍यांच्या आडतीवर घालताना दिसून येत आहे. ही संधी साधत व्यापारीही शेतीमाल कमी दराने खरेदी करीत आहेत. लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हरभरा, तूर, मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. विशेष म्हणजे येथे शासनाच्या मालकीचे गोडावूनही नव्हते. मात्र, यातून मार्ग काढीत एका शेतकर्‍याचे गोडावून किरायाने घेतले. या हमीभाव केंद्रावर शेतीमालाला बाजारपेठेपेक्षा उत्तम दर मिळत गेल्याने शेतकर्‍यांची आर्थिक लूट थांबण्यास मदत झाली. विशेष म्हणजे शेतीमाल खरेदी केल्यानंतर संबंधित शेतकर्‍यांना महिनाभराच्या आता पैसेही मिळत होते. तालुक्यामध्ये हरभर्‍याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने या केंद्रावर आजवर तब्बल १३ हजार क्विंटल हरभर्‍याची आवक झाली. विशेष म्हणजे, बाजारपेठेत २३०० तर केंद्रावर ३ हजार १०० रूपये दर मिळाला. या माध्यमातून शेतकर्‍यांचा प्रति क्विंटल ७०० ते ८०० रूपयांचा फायदा झाला. दरम्यान, सदरील हरभरा खरेदी केंद्र १० मे पासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रावर आजही अनेक शेतकर्‍यांचा हरभरा पडून आहे. शासनाने हे केंद्र काही दिवसांसाठी पुन्हा सुरू करावे, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. याबाबत सभापती दिनकरराव जावळे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लोहारा येथील खरेदी केंद्रावर कधीही व्यापार्‍यांना थारा दिला नाही. त्यामुळेच तूर, मकासह आदी शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात झाली. आजूनही हजारो क्विंटल पडून असल्याने खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)