शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान, अधिकारी-कर्मचाऱ्यांना धन कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 18:06 IST

ग्रामपंचायत निवडणुका होऊन सरले अडीच महिने झाले तरी मानधन मिळण्याची प्रतीक्षा

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटात प्रशासकीय यंत्रणेने राबराब राबवून घेतलेपरंतु लालफितीच्या कारभारामुळे मानधन मिळालेले नाही.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ३३ दिवस चालली. यामध्ये सुमारे १२ हजार महसूल, जिल्हा परिषदेचे आणि तितकेच पोलीस कर्मचारी निवडणूक शांततेत, शिस्तीत आणि सुरळीत पार पडण्यासाठी राबले. या मेहनतीपोटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा कायम आहे.

कोरोनाचे संकट त्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रशासकीय यंत्रणेने राबराब राबवून घेतले; परंतु लालफितीच्या कारभारामुळे मानधन मिळालेले नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील ५७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. ३२ ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध, तर ६ ठिकाणी निवडणूकच घेतली गेली नाही. जिल्ह्यातील ३ कोटी २ लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक व्यवस्थापन खर्चात कपात केली असली तरी निवडणूक नियोजनासाठी जेवढा खर्च लागणार आहे, तेवढा करावाच लागला. प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुमारे ४९ हजार रुपये प्रशासकीय खर्च झाला. प्रशिक्षण, मतदान आणि मतमोजणी या प्रक्रियेसह इतर कामांत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येते. २३ हजार ३५६ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी दीड ते दोन कोटींचा निधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

निधीची अडचणअनुदान आले आहे. ते किती आले आहे, ते अद्याप कळलेले नाही. येत्या एक- दोन दिवसांत जे अनुदान आले ते वाटप करण्यात येईल. पूर्ण अनुदान आलेले नाही. मानधन कुणाला किती द्यायचे ते तहसील पातळीवर ठरविण्यात येते, असे निवडणुकीनंतर सांगण्यात आले होते, तर यासंदर्भात बोलताना तहसीलदार शंकर लाड म्हणाले, अद्याप निधी न आल्याने अनुदान वाटप करण्यात आलेले नाही.

जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींची झाली निवडणूक -६१७निवडणुकीत कर्तव्य बजावलेले अधिकारी - २००इतर कर्मचारी किती - २३,१५६

तालुकानिहाय आढावातालुका- ग्रामपंचायती - अधिकारी-कर्मचारीवैजापूर- १०५ -३९००सिल्लोड- ८३ -३१५४कन्नड -८३ -३१५४पैठण -८० -३०४०औरंगाबाद -७७ -२९२६गंगापूर -७१ -२६९८फुलंब्री -५३ -२०१४सोयगाव -४० -१५२०खुलताबाद- २५ -९५०

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAurangabadऔरंगाबाद