शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

विद्यापीठांमध्ये हळूहळू ‘अध्यासन केंद्रांची’ संकल्पना होऊ लागली लुप्त!

By admin | Updated: June 24, 2014 01:07 IST

स. सो. खंडाळकर, औरंगाबाद केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातच नव्हे तर जवळपास सर्वच विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्रांची संकल्पना हळूहळू लुप्त होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

स. सो. खंडाळकर, औरंगाबादकेवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातच नव्हे तर जवळपास सर्वच विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्रांची संकल्पना हळूहळू लुप्त होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याचे कारण म्हणजे यासंदर्भात असलेले विद्यापीठाचे नियम. आहेत तीच अध्यासन केंद्रे नीट चालतात की नाही, हे बघायला कुणाला वेळ नाही. मग पुन्हा नव्याने अशी केंद्रे कुठे स्थापन करीत बसता, अशीच काही तरी हात वर करण्याची भूमिका विद्यापीठांची दिसून येत आहे. आता कुठल्याही अध्यासन केंद्रांसाठी विद्यापीठांकडे आर्थिक तरतूद नाही. स्वत:कडे तर तरतूद नाहीच; पण कुठून मिळवून आणण्याचीही धडपड नाही. ज्यांनी मागणी केली, त्यांची निधी देण्याची हिंमत असेल तर होईल अध्यासन केंद्र, अन्यथा मागणीच करू नका, अशाच भूमिकेत विद्यापीठे दिसून येत आहेत. हे सारे अलीकडेच इथल्या विद्यापीठात कुलगुरू म्हणून रुजू झालेल्या डॉ. बी. ए. चोपडे यांच्याशी झालेल्या एका चर्चेतून स्पष्ट झाले. संत कबीर अध्यासन केंद्र स्थापन करण्यात यावे, अशी मागणी घेऊन गेलेल्या या शिष्टमंडळाला कुलगुरूंनी दहा कोटी जमा करा म्हणजे कबीरांच्या नावाने चालणारे हे अध्यासन केंद्र व्यवस्थित चालेल, असा सल्ला दिला.देशभरात कबीरांचे मठ भरपूर आहेत आणि त्यांच्याकडे पैसाही भरपूर असतो. हे काम सहज होईल, असेही त्यांचे म्हणणे पडले. खरे तर अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी दहा कोटींची गरज असते काय? हा प्रश्न आहे आणि त्यामुळेच अलीकडच्या काळात विद्यापीठात कुठलेच अध्यासन केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. सुरू होण्याची शक्यताही नाही. लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू व्हावे ही मागणी ना विद्यापीठाच्या, ना सरकारच्या मनी आहे. असे असले तरी नाशिकला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात वामनदादांच्या नावाने अध्यासन केंद्र विद्यापीठानेच सुरू केले असल्याची माहिती मिळते. मागणी करणाऱ्यांच्याच माथी जबाबदारी टाकून देण्यापेक्षा यूजीसी वा शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची व पुढे योग्य तो पाठपुरावा करण्याची भूमिका विद्यापीठांना घेता येऊ शकणार नाही का, हा प्रश्न आहे; पण विद्यापीठे अशी रुची दाखवत नसून अध्यासन केंद्रांची मागणी घेऊन जाणाऱ्यांच्याच गळ्यात जबाबदारीची माळ घालून मोकळे होत आहेत, हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. अशाने विद्यापीठांमधील आहेत ती अध्यासन केंद्रे बंद पडतील व नवे सुरू होण्याचा मुद्दाच नाही.