शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
4
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
5
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
6
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
7
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
8
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
9
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
10
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
11
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
12
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
13
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
14
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
15
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
16
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
17
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
18
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
19
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
20
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर

ग्रा.पं.स्तरावरील कामकाज ठप्प

By admin | Updated: July 11, 2014 01:03 IST

सेनगाव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ग्रा. पं. स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रामसेवक संपावर गेल्याने ग्रामीण भागात शेतकरी-ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे.

सेनगाव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ग्रा. पं. स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रामसेवक संपावर गेल्याने ग्रामीण भागात शेतकरी-ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे. ग्रा. पं. स्तरावरील विविध प्रमाणपत्रे मिळत नसल्याने कार्यालयीन कामकाजही ठप्प झाले आहे.रोजगार हमी योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाल कंत्राटी शिक्षकांप्रमाणे करावा, वीस ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करणे, आदर्श ग्रामसेवकांना दोन आगाऊ वेतनवाढ द्याव्यात, प्रवासभत्ता पगारासोबत तीन हजार करणे, ग्रामसेवकांवरील कामाचा ताण कमी करणे यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवकांच्या वतीने २ जुलैैपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे ग्रामपंचायत पातळीवर कामे होत नसल्याने ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे. रहिवासी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, नमुना नं.८, उत्पन्न प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रे ग्रामसेवकांअभावी मिळत नसल्याने विद्यार्थी, ग्रामस्थांची अडचण झाली आहे. विद्यार्थ्यांना ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक कामकाजासाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळत नसल्याने आठ दिवसांपासून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. ग्रामसेवकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे सर्वांचीच गैरसोय होत असताना प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली नसल्याने सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या यंत्रणेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामसेवकांना काढण्यात आलेल्या नोटीसाही ग्रामसेवकांनी स्विकारल्या नसल्याने संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांच्या पत्यावर नोटीसा पाठविण्याची कार्यवाही पंचायत समिती स्तरावर करण्यात आली आहे; परंतु त्याला संघटनेने प्रतिसाद दिला नसल्याने या आंदोलनामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)ग्रामसेवकांचा संप सुरूचहिंगोली जिल्ह्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी २ जुलैैपासून ग्रामसेवक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे ग्रामपंचायत पातळीवरील कामे ठप्प झाली आहेत. ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे.रहिवासी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, नमुना नं.८, उत्पन्न प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रे ग्रामसेवकांअभावी मिळत नसल्याने विद्यार्थी, ग्रामस्थांची अडचण झाली आहे.शैक्षणिक कामकाजासाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळत नसल्याने आठ दिवसांपासून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली नसल्याने वेठीस धरणाऱ्या यंत्रणेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. जि.प.ने काढलेल्या नोटीसाही ग्रामसेवकांनी स्विकारल्या नाहीत.या आंदोलनामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.