शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

ग्रा.पं.स्तरावरील कामकाज ठप्प

By admin | Updated: July 11, 2014 01:03 IST

सेनगाव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ग्रा. पं. स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रामसेवक संपावर गेल्याने ग्रामीण भागात शेतकरी-ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे.

सेनगाव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ग्रा. पं. स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रामसेवक संपावर गेल्याने ग्रामीण भागात शेतकरी-ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे. ग्रा. पं. स्तरावरील विविध प्रमाणपत्रे मिळत नसल्याने कार्यालयीन कामकाजही ठप्प झाले आहे.रोजगार हमी योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाल कंत्राटी शिक्षकांप्रमाणे करावा, वीस ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करणे, आदर्श ग्रामसेवकांना दोन आगाऊ वेतनवाढ द्याव्यात, प्रवासभत्ता पगारासोबत तीन हजार करणे, ग्रामसेवकांवरील कामाचा ताण कमी करणे यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवकांच्या वतीने २ जुलैैपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे ग्रामपंचायत पातळीवर कामे होत नसल्याने ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे. रहिवासी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, नमुना नं.८, उत्पन्न प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रे ग्रामसेवकांअभावी मिळत नसल्याने विद्यार्थी, ग्रामस्थांची अडचण झाली आहे. विद्यार्थ्यांना ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक कामकाजासाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळत नसल्याने आठ दिवसांपासून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. ग्रामसेवकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे सर्वांचीच गैरसोय होत असताना प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली नसल्याने सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या यंत्रणेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामसेवकांना काढण्यात आलेल्या नोटीसाही ग्रामसेवकांनी स्विकारल्या नसल्याने संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांच्या पत्यावर नोटीसा पाठविण्याची कार्यवाही पंचायत समिती स्तरावर करण्यात आली आहे; परंतु त्याला संघटनेने प्रतिसाद दिला नसल्याने या आंदोलनामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)ग्रामसेवकांचा संप सुरूचहिंगोली जिल्ह्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी २ जुलैैपासून ग्रामसेवक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे ग्रामपंचायत पातळीवरील कामे ठप्प झाली आहेत. ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे.रहिवासी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, नमुना नं.८, उत्पन्न प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रे ग्रामसेवकांअभावी मिळत नसल्याने विद्यार्थी, ग्रामस्थांची अडचण झाली आहे.शैक्षणिक कामकाजासाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळत नसल्याने आठ दिवसांपासून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली नसल्याने वेठीस धरणाऱ्या यंत्रणेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. जि.प.ने काढलेल्या नोटीसाही ग्रामसेवकांनी स्विकारल्या नाहीत.या आंदोलनामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.