शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

वाळू तस्करांना राजकीय अभय

By admin | Updated: May 28, 2014 00:25 IST

रवि गात , अंबड अंबड तालुक्यास मोठा गोदाकाठ लाभलेला आहे. मागील काही काळापासून गोदापात्रातून करण्यात येणार्‍या वाळू तस्करीने तालुक्यात समांतर काळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे.

रवि गात , अंबड अंबड तालुक्यास मोठा गोदाकाठ लाभलेला आहे. मागील काही काळापासून गोदापात्रातून करण्यात येणार्‍या वाळू तस्करीने तालुक्यात समांतर काळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. या वाळू तस्करांना राजकीय अभय मिळत असल्याने तस्करांचे काहीही वाकडे होत नाही या आविर्भावात तस्करी सुरु आहे. अर्थ व्यवस्थेतही मोठी उलटापालट केली आहे. वाळू तस्करांकडे काही काळापूर्वी एक ट्रक होता त्यांची आज मोठ्या संख्येने अत्याधुनिक ट्रकव्दारे वाळू तस्करी सुरु असल्याचे पाहावयास मिळते. संपूर्ण गोदाकाठात सध्या वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. गोदापात्राची पाहणी केली असता गोदापात्र वाळू माफियांनी चाळणी केल्याचे दिसते. जेसीबी, पोकलेन, यांत्रिक बोट आदी यंत्रांच्या सहाय्याने वाळू माफियांनी गोदापात्राचे विद्रुपीकरण केल्याचे पाहावयास मिळते. गोदापात्रात अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे आहेत. काही ठिकाणी तर पूल बांधण्यात आले आहे. ठिकाणी कोठेही वाळू न दिसता आपल्याला आता केवळ माती मिळते. काही महिन्यांपूर्वी याच गोदापात्रात रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करणार्‍या पोकलँडने मजुराच्या चिमुरड्याचा बळी घेतला. यावेळी अन्य एक बालक गंभीर जखमी झाले होते. घटना घडल्यानंतर मोठा गहजब उडाला. कारवाई मात्र शून्य. एवढया मोठया घटनेनंतरही वाळू तस्करी अद्यापही तशीच बिनदिक्कतपणे सुरु आहे. तालुक्यात रात्रीच्या वेळी सर्रास वाळू तस्करी सुरु आहे. या वाळू तस्करीच्या मार्गाबाबत सामान्य जनतेमध्ये चर्चा आहे. महसूल विभागाचीही कारवाई कमी पडत आहे. वाळू तस्करांवर किरकोळ कारवाईनंतर काही दिवसांतच कारवाईनंतर वेगाने वाळू तस्कारी होत असल्याचे दिसून येते. महसूल विभाग कारवाईस कमी पडतो की, काय अशी चर्चा आहे. अंबड शहरात रात्री नऊ वाजेनंतर वाळु तस्करी करणारी रिकामी वाहने गोंदी, शहागडे जाताना दिसतात. या वाहनांची संख्या मोठी आहे. तसेच मध्यरात्रीनंतर हीच वाहने वाळू भरुन जालना, औंरगाबाद शहराकडे जाताना दिसतात. शहरातून जाणारी ही वाहने सामान्य नागरिकांना दिसतात. यातून अनेकदा मोठे तसेच किरकोळ अपघातही होतात. अंबड व घनसावंगी तालुक्यात विस्तीर्ण नदीपात्रे आहेत. यातून दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. अवैध उपसा करणार्‍यांवर महसूल विभागाने कायमस्वरुपी कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींतून होत आहे. नदीपात्राचा पर्यावरणदृष्ट्या ºहास होत आहे.