शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

वाळू तस्करांना राजकीय अभय

By admin | Updated: May 28, 2014 00:25 IST

रवि गात , अंबड अंबड तालुक्यास मोठा गोदाकाठ लाभलेला आहे. मागील काही काळापासून गोदापात्रातून करण्यात येणार्‍या वाळू तस्करीने तालुक्यात समांतर काळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे.

रवि गात , अंबड अंबड तालुक्यास मोठा गोदाकाठ लाभलेला आहे. मागील काही काळापासून गोदापात्रातून करण्यात येणार्‍या वाळू तस्करीने तालुक्यात समांतर काळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. या वाळू तस्करांना राजकीय अभय मिळत असल्याने तस्करांचे काहीही वाकडे होत नाही या आविर्भावात तस्करी सुरु आहे. अर्थ व्यवस्थेतही मोठी उलटापालट केली आहे. वाळू तस्करांकडे काही काळापूर्वी एक ट्रक होता त्यांची आज मोठ्या संख्येने अत्याधुनिक ट्रकव्दारे वाळू तस्करी सुरु असल्याचे पाहावयास मिळते. संपूर्ण गोदाकाठात सध्या वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. गोदापात्राची पाहणी केली असता गोदापात्र वाळू माफियांनी चाळणी केल्याचे दिसते. जेसीबी, पोकलेन, यांत्रिक बोट आदी यंत्रांच्या सहाय्याने वाळू माफियांनी गोदापात्राचे विद्रुपीकरण केल्याचे पाहावयास मिळते. गोदापात्रात अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे आहेत. काही ठिकाणी तर पूल बांधण्यात आले आहे. ठिकाणी कोठेही वाळू न दिसता आपल्याला आता केवळ माती मिळते. काही महिन्यांपूर्वी याच गोदापात्रात रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करणार्‍या पोकलँडने मजुराच्या चिमुरड्याचा बळी घेतला. यावेळी अन्य एक बालक गंभीर जखमी झाले होते. घटना घडल्यानंतर मोठा गहजब उडाला. कारवाई मात्र शून्य. एवढया मोठया घटनेनंतरही वाळू तस्करी अद्यापही तशीच बिनदिक्कतपणे सुरु आहे. तालुक्यात रात्रीच्या वेळी सर्रास वाळू तस्करी सुरु आहे. या वाळू तस्करीच्या मार्गाबाबत सामान्य जनतेमध्ये चर्चा आहे. महसूल विभागाचीही कारवाई कमी पडत आहे. वाळू तस्करांवर किरकोळ कारवाईनंतर काही दिवसांतच कारवाईनंतर वेगाने वाळू तस्कारी होत असल्याचे दिसून येते. महसूल विभाग कारवाईस कमी पडतो की, काय अशी चर्चा आहे. अंबड शहरात रात्री नऊ वाजेनंतर वाळु तस्करी करणारी रिकामी वाहने गोंदी, शहागडे जाताना दिसतात. या वाहनांची संख्या मोठी आहे. तसेच मध्यरात्रीनंतर हीच वाहने वाळू भरुन जालना, औंरगाबाद शहराकडे जाताना दिसतात. शहरातून जाणारी ही वाहने सामान्य नागरिकांना दिसतात. यातून अनेकदा मोठे तसेच किरकोळ अपघातही होतात. अंबड व घनसावंगी तालुक्यात विस्तीर्ण नदीपात्रे आहेत. यातून दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. अवैध उपसा करणार्‍यांवर महसूल विभागाने कायमस्वरुपी कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींतून होत आहे. नदीपात्राचा पर्यावरणदृष्ट्या ºहास होत आहे.