शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अपडाऊन

By admin | Updated: July 19, 2014 00:42 IST

कळंब : तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयाचे खातेप्रमुख, कर्मचारी मुख्यालयी न राहता इतरत्र राहून अपडाऊन करत आहेत.

कळंब : तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयाचे खातेप्रमुख, कर्मचारी मुख्यालयी न राहता इतरत्र राहून अपडाऊन करत आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या अपडाऊनचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून, सरकारी बाबू कार्यालयात उपस्थित नसल्याने एकूणच कामकाजावर परिणाम झालेला दिसून येत आहे.कळंब शहरात तहसील पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी या कार्यालयाबरोबरच लघु पाटबंधारे उपविभाग (जि. प.), ल. पा. स्थानिक स्तर (जलसंपदा), लघु पाटबंधारे उपविभाग भूम मुख्यालय कळंब, लघु पाटबंधारे (राज्य) उपविभाग, दुय्यम नोंदणी, सहायक निबंधक, तालुका आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जि. प. बांधकाम उपविभाग, गटशिक्षणाधिकारी, निरीक्षक भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण, दुकाने निरीक्षक आदी विविध शासकीय विभागाचे तालुकास्तरीय कार्यालय कार्यरत आहेत. या शासकीय कार्यालयातील विविध खातेप्रमुख आपल्या मुख्यालयी राहत नसून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक वगळता अन्य कार्यालयाचा कारभार उंटावरून शेळ्या राखणे या म्हणीप्रमाणे चालविला जात आहे. विशेषत: काही विभागाच्या खातेप्रमुखांना शासकीय निवासस्थान उपलब्ध असतानाही त्यामध्ये राहत नसल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय लघु पाटबंधारे विभागाचे सर्वच उपविभागीय अभियंता बाहेबगावी राहत असून, साहेबच मुख्यालयी थांबत नसल्याने त्यांच्याखालील शाखा, कनिष्ठ अभियंता स्तरीय कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत, हीच अवस्था तालुका कृषी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी, सार्वजनिक बांधकाम, जि. प. बांधकाम आदी विभागाच्या खातेप्रमुखपदी आहे. अधिकारीही भेटणे दुर्लभमहावितरण कंपनीचे ज्या-त्या युनिटचे कनिष्ठ अभियंता जि. प. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंते, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता यांच्याकडे विकास कामाची तांत्रिकदृष्ट्या देखभाल करणे, सुधारणा करणे आदी महत्वाची कामे असतात. असे असतानाही यातील बहुतांश अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. अनेकांचे भ्रमणध्वनी लागत नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, ग्रामपंचायतीना शेतकऱ्यांना विविध कामासाठी या कर्मचाऱ्यांचे मुखदर्शन होणेही दुर्लभ झाले आहे. यामुळे महसूल विभागाने अशा कार्यालयाचा अचानक पंचनामा करून गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)कामकाजावर परिणामअधिकारी मुख्यालयी स्थानिकला राहत नसल्याने बाहेर गावावरून ये-जा करतात. याचा सर्वसामान्यांच्या कामकाजावर विपरित परिणाम होत असून साहेबांची उपस्थिती केव्हा लाभेल, हे लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनाही सांगता येत नाही. याबाबत अधिकच चौकशी केली असता सरळ जिल्हास्तरावर मिटींग असल्याचे कारण सांगितले जाते. खातेप्रमुख मुख्यालयी असल्यावर ऐनवेळा एखादा प्रसंग, तातडीचे काम निघाल्यास तातडीने निर्णय घेता येतो. परंतु कळंब तालुक्यात हे अधिकारी राहत नसल्याने कार्यक्षम निर्णय तर सोडाच नागरिकांची नियमित भेटही होत नाही.