शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शासकीय कार्यालये घाणीच्या विळख्यात

By admin | Updated: August 4, 2014 00:50 IST

उस्मानाबाद : शहरातील जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,

उस्मानाबाद : शहरातील जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर कार्यालयांना कचराकुंडीचे स्वरूप आले आहे़ या कार्यालयांच्या भिंतींना पिचकाऱ्यांचे रंग चढू लागले असून, एकीकडे स्वच्छतेचा जयघोष करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कार्यालये स्वच्छ ठेवण्याकडेच दूर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे़ शहरातील रोहयो उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटच्या बाजूला भिंतीवर थुंकुन-थुंकून रंग चढविण्यात आला आहे़ या परिसरातील स्वच्छतागृहाचे काम अपूर्ण असल्याने तलाठी कार्यालयाच्या बाजूला उघडयावर लघू शंका केली जात आहे़ पंचायत समितीच्या कार्यालयातील अनेक खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत़ तर आतमध्ये भिंतींचे कोपरे रंगले आहेत़ विशेष म्हणजे यात काही अधिकारी, कर्मचारी आघाडीवर असल्याचे दिसून येते़जिल्हा परिषद इमारतीतील अवस्थाही काही वेगळी नाही़ स्वच्छतागृहामध्ये घाणीचे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोंडाला रुमाल बांधून जावे लागते़ वरिष्ठांना याबाबत सांगूनही सफाईकडे दूर्लक्ष केल्याचे कर्मचारी सांगतात़ तसेच तेथील रविवारी कार्यालयाला कुलूप लवणे आवश्यक असताना काही कार्यालये सताड उघडी असल्याचे दिसून आले़ तर पाण्यासाठी बसविण्यात आलेले फ्रिज बंद पडले आहे. अधिकाऱ्यांच्या स्वच्छतागृहामध्ये खुर्च्या व टेबल ठेवण्यात आले आहेत़ मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ३५ ते ४० शासकीय कार्यालय आहेत. दुमजली इमारतीतील अस्वच्छतेचा पाडा कायम आहे़ इमारतीच्या खिडक्या, कोपऱ्याला दारुच्या बाटल्या सर्रास दिसून आल्या. स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य कायमचेच आहे़ तर बहुतांश ठिकाणी विद्युत तारांच्या वायरांबाबत आवश्यक ती काळजी घेतली नसल्याचे दिसून आले़ राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची कागदपत्रे व्हरांड्यात ठेवण्यात आली आहेत़ ही कागदपत्र कोणीही घेवून जावू शकतो. विशेष म्हणजे या इमारतीत एकही सुरक्षा रक्षक दिसून आला नाही़लाखोची वाहने भंगारात.. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, प्रशासकीय मध्यवर्ती या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाडया खराब झाल्याने कार्यालयाच्या आवारात उभा करण्यात आल्या आहेत़ जिल्हा परिषद इमारतीच्या पाठीमागे दोन ते पाणी टँकर, तीन ते चार गाडया कुजत भंगारागत अवस्थेत जात आहेत़पिण्याचे पाणी नाहीशहरातील बहुतांश शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नसल्याचे दिसून आले. तसेच तेथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना पाणी पिण्यासाठी बाहेरच्या हाटेल व अथवा कॅन्टीनचा आधार पाणी पिण्यासाठी घ्यावा लागतो. मध्यवती प्रशासकीय इमारतीमधील काही स्वच्छतागृहांना कायमचे कुलूप लावण्यात असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांसह महिलांची मोठी कुचंबणा होते़