शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार

By admin | Updated: June 9, 2014 01:05 IST

औरंगाबाद : शिवसेनेची शिवशाही हेच खरे बळीचे राज्य असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे.

औरंगाबाद : शिवसेनेची शिवशाही हेच खरे बळीचे राज्य असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे. हेच सरकार राज्यातील सर्व घटकांना न्याय देईल, असे सांगत शिवसेनेचे उपनेते व चित्रपट अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा आज पुढे केले. शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. कोल्हे बोलत होते. खा. चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, किशनचंद तनवाणी, लता दलाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. हर्षवर्धन जाधव, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. लोकसभेत मोठे मताधिक्य दिल्याबद्दल मतदारांना दंडवत घालून खा. खैरे यांनी, येणाऱ्या विधानसभेत मराठवाड्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन उपस्थिताना केले. सत्तेचा वापर पक्षासाठी करा, पक्षांतर्गत कुजबुज बंद करा, अशा कार्यकर्त्यांना सूचना करून ते म्हणाले, आम्हाला विसरा; परंतु उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना विसरू नका.महिलांना काम करू द्या- कला ओझामहापौर कला ओझा यांनी तडाखेबाज भाषण केले. त्या म्हणाल्या, महापालिकेत युतीची सत्ता आहे. महापालिकेत महिलांना व्यवस्थित काम करू द्या. विधानसभेसाठी एखाद्या महिलेला संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले. आ. जाधव, सुहास दाशरथे, अंबादास दानवे आदींची यावेळी भाषणे झाली. तत्पूर्वी गोपीनाथ मुंडे, विलास अवचट, विलास भानुशाली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गरजूंना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. गोरक्षणासाठी आठ ट्रक चारा वाटप करण्यात आला.