शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

धान्य वाटपात गोलमाल!

By admin | Updated: May 4, 2016 00:08 IST

आष्टी : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने तालुका दुष्काळाचे चटके सोसत आहे. राज्य शासन या दुष्काळी भागाला जसे जमेल तसे विविध योजना आणून दुष्काळावर मात करण्याच्या प्रयत्न करीत आहे

आमदारांकडून पंचनामा : एका पोत्यामागे तीन किलो धान्य कमीआष्टी : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने तालुका दुष्काळाचे चटके सोसत आहे. राज्य शासन या दुष्काळी भागाला जसे जमेल तसे विविध योजना आणून दुष्काळावर मात करण्याच्या प्रयत्न करीत आहे; परंतु या दुष्काळाचे जसे जमेल तसे भांडवल करून पैसे कमवित असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी आ.भीमराव धोंडे यांनी सोमवारी दुपारी एक वाजता कडा येथील शासकीय धान्य गोदामाला अचानक भेट देऊन तेथील धान्याच्या गोण्यांचे वजन केले असता प्रत्येक गोण्यांमध्ये तीन किलो धान्य कमी असल्याचे आढळून आले.कडा येथील शासकीय गोदाममधून स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरीत केले जाते; मात्र हे धान्य ज्यावेळी दुकानदारापर्यंत पोहोचते, त्यावेळी प्रत्येक गोणीत ५० किलोऐवजी २ ते ३ किलो धान्य कमी भरत असल्याची तक्रार काही दुकानदारांनी केली होती. सोमवारी दुपारी कडा येथील शासकीय गोदामास आ.धोंडे यांनी भेट दिली. सुमारे अडीच तास गोदामात थांबून सर्व नोंदीची तपासणी करीत भरलेल्या काही गोण्यांचे वजन केले. त्यावेळी तिथे बाहेरून आलेला गहू उतरून घेण्याचे आणि ते एकत्र करून गोण्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होते. उतरून घेतलेली गोणी ५० किलो वजनाची, तर स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणारी गोणी ४८ किलो वजनाची भरली. अशा दहा पंधरा गोण्या मोजल्या तर प्रत्येक गोणीत कमी धान्य असल्याचे निदर्शनास आले.आ.धोंडे यांनी तेथील गोदाम रक्षक किशोर जवंजाळ यांना याचा जाब विचारला; मात्र जवंजाळ हे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार इकबाल सय्यद यांना बोलावून घेत सर्वांसमोर पंचनामा केला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)धोंडे म्हणतात, काळा बाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाहीदुष्काळात सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळतात का, काही याची चौकशी करून धान्याचा काळाबाजार करणा-यांची गय केली जाणार नाही, असे आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले.दरम्यान झालेल्या सर्व प्रकारची चौकशी करून गोरगरीब लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्यांवर कारवाई करावी नसता आम्ही लोकशाही मार्गाने अंदोलन करून कारवाईस भाग पाडू, असा इशारा छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वाघुले यांनी दिला आहे.सदरील घडलेल्या प्रकरणाबाबत कडा येथील गोडाऊन सील करण्यात आले असून, गोडाऊनची तपासणी सुरु करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची रीतसर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.- रामेश्वर गोरे, तहसीलदार आष्टी