शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

धान्य वाटपात गोलमाल!

By admin | Updated: May 4, 2016 00:08 IST

आष्टी : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने तालुका दुष्काळाचे चटके सोसत आहे. राज्य शासन या दुष्काळी भागाला जसे जमेल तसे विविध योजना आणून दुष्काळावर मात करण्याच्या प्रयत्न करीत आहे

आमदारांकडून पंचनामा : एका पोत्यामागे तीन किलो धान्य कमीआष्टी : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने तालुका दुष्काळाचे चटके सोसत आहे. राज्य शासन या दुष्काळी भागाला जसे जमेल तसे विविध योजना आणून दुष्काळावर मात करण्याच्या प्रयत्न करीत आहे; परंतु या दुष्काळाचे जसे जमेल तसे भांडवल करून पैसे कमवित असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी आ.भीमराव धोंडे यांनी सोमवारी दुपारी एक वाजता कडा येथील शासकीय धान्य गोदामाला अचानक भेट देऊन तेथील धान्याच्या गोण्यांचे वजन केले असता प्रत्येक गोण्यांमध्ये तीन किलो धान्य कमी असल्याचे आढळून आले.कडा येथील शासकीय गोदाममधून स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरीत केले जाते; मात्र हे धान्य ज्यावेळी दुकानदारापर्यंत पोहोचते, त्यावेळी प्रत्येक गोणीत ५० किलोऐवजी २ ते ३ किलो धान्य कमी भरत असल्याची तक्रार काही दुकानदारांनी केली होती. सोमवारी दुपारी कडा येथील शासकीय गोदामास आ.धोंडे यांनी भेट दिली. सुमारे अडीच तास गोदामात थांबून सर्व नोंदीची तपासणी करीत भरलेल्या काही गोण्यांचे वजन केले. त्यावेळी तिथे बाहेरून आलेला गहू उतरून घेण्याचे आणि ते एकत्र करून गोण्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होते. उतरून घेतलेली गोणी ५० किलो वजनाची, तर स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणारी गोणी ४८ किलो वजनाची भरली. अशा दहा पंधरा गोण्या मोजल्या तर प्रत्येक गोणीत कमी धान्य असल्याचे निदर्शनास आले.आ.धोंडे यांनी तेथील गोदाम रक्षक किशोर जवंजाळ यांना याचा जाब विचारला; मात्र जवंजाळ हे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार इकबाल सय्यद यांना बोलावून घेत सर्वांसमोर पंचनामा केला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)धोंडे म्हणतात, काळा बाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाहीदुष्काळात सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळतात का, काही याची चौकशी करून धान्याचा काळाबाजार करणा-यांची गय केली जाणार नाही, असे आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले.दरम्यान झालेल्या सर्व प्रकारची चौकशी करून गोरगरीब लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्यांवर कारवाई करावी नसता आम्ही लोकशाही मार्गाने अंदोलन करून कारवाईस भाग पाडू, असा इशारा छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वाघुले यांनी दिला आहे.सदरील घडलेल्या प्रकरणाबाबत कडा येथील गोडाऊन सील करण्यात आले असून, गोडाऊनची तपासणी सुरु करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची रीतसर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.- रामेश्वर गोरे, तहसीलदार आष्टी