शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

संघाचा जानेवारीत महासंगम

By admin | Updated: December 25, 2014 00:46 IST

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने औरंगाबादेत पहिल्यांदाच ‘देवगिरी महासंगम’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने औरंगाबादेत पहिल्यांदाच ‘देवगिरी महासंगम’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ११ जानेवारी २०१५ रोजी आयोजित या महासंगमात ११ जिल्ह्यांतील ३० हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक हजर राहणार आहेत. १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. पुढील वर्षी संघ ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत ‘देवगिरी महासंगम’ शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठी बीड बायपास रोडवरील बाळापूर शिवार येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जागेवर शिबीर होणार आहे. सुमारे ९५ एकर जागेवर या महासंगमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मराठवाड्यातील ८ व खान्देशातील ३, असे ११ जिल्ह्यांतील ३० हजार स्वयंसेवक एकत्र येत आहेत. या सोहळ्याचे नियोजन मागील दीड वर्षापासून सुरू आहे. मैदानावर मंडप उभारण्याचे काम ३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. येथील मैदानाला धर्मवीर संभाजी महाराज नगरी, असे नाव देण्यात आले आहे. मैदानात निवासासाठी १५ एकरांवर १५ कक्ष उभारण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे. चार मोठ्या जिल्ह्यांसाठी दोन कक्ष असणार आहेत. प्रत्येक निवासी कक्षाच्या बाजूला एक स्वयंपाकगृह उभारण्यात येत आहे. याशिवाय मुख्य कार्यक्रमासाठी ४० एकर जागेवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्यासाठी ७ ते ८ एकराची जागा सोडण्यात आली आहे. १० एकर जागेवर पार्किंग करण्यात येणार आहे. याशिवाय चार मिनी दवाखाने, अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था असणार आहे. ५ जानेवारीपर्यंत मंडप उभारणीचे काम पूर्ण होईल, यासाठी २२ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. याद्वारे ६०० स्वयंसेवक संपूर्ण व्यवस्था करीत आहेत, अशी माहिती आखणीप्रमुख जगन्नाथ गुळवे यांनी दिली. ११ जानेवारी रोजी आयोजित देवगिरी महासंगम सोहळ्यास सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुख्य सोहळा सायंकाळी ५.३० वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी, दुपारी १२ वाजेपर्यंत ११ जिल्ह्यांतील ३० हजार स्वयंसेवक मैदानात दाखल होणार आहेत. २ ते ३.३० वाजेदरम्यान जिल्हानिहाय सत्र होणार आहेत. ४.३० वाजता संघाच्या गणवेशात स्वयंसेवक मैदानात हजर होतील. सायंकाळचा मुख्य कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहणार आहे, अशी माहिती देवगिरी प्रांत प्रचारप्रमुख वामनराव देशपांडे यांनी दिली.