शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

स्वातंत्र्यपूर्व काळापासून उर्दूचा सुवर्णकाळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:03 IST

उर्दू साहित्यात मोठे योगदान असलेले आणि अनेक पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्त्व म्हणजे अस्लम मिर्झा. अदबच्या जगात अत्यंत आदराने त्यांचे नाव घेतले ...

उर्दू साहित्यात मोठे योगदान असलेले आणि अनेक पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्त्व म्हणजे अस्लम मिर्झा. अदबच्या जगात अत्यंत आदराने त्यांचे नाव घेतले जाते. ‘उर्दू साहित्यात औरंगाबादचे स्थान’या विषयावर त्यांनी ‘लोकमत’समोर मांडलेला इतिहास.

अस्लम मिर्झा- ज्येष्ठ साहित्यिक

औरंगाबाद : मराठवाड्यातील ‘दकनी’ उर्दू भाषेला ७०० वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. अनेक भाषांच्या मिश्रणातून ही गोड भाषा जन्माला आली. काही राज्यकर्त्यांनी उर्दूला राजभाषेचा दर्जा दिला तर काहींना दिला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून खरा सुवर्णकाळ पाहायला मिळतो. मोठमोठे लेखक, कवी, शायर १८ व्या शतकात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. औरंगाबाद शहर पूर्वीही उर्दूच्या चळवळीचा केंद्रबिंदू होते आणि आजही आहे.

मराठवाडा ज्याला इतिहासात आजही ‘दक्कन’ म्हटले जाते. सुफी, संत, राज्यकर्ते, व्यापारी अनेकांना हा परिसर खूपच आवडत होता. अलाऊद्दीन खिलजीने सर्वत्र आपली पाळेमुळे रोवायला सुरुवात केली. इ.स. १३०० च्या आसपासचा हा विषय. त्याच्यासोबत दिल्लीचे सैनिकही असत. मराठवाड्यात अरब व्यापाराच्या निमित्ताने, तर वेगवेगळ्या भाषा बोलणारे सैनिक येत. दैनंदिन व्यवहारात शब्दांचे आदानप्रदान होत होते. याच कालखंडात उर्दूने बारसे धरले. १३२७ मध्ये मोहमद तुघलकाने आपली राजधानी दौलताबाद येथे आणली. त्याच्यासोबत हजारो सैनिक आले. हरयानवी, पंजाबी, खडी बोली, बुंदेली, पारसी, तुर्की अशा कितीतरी भाषा बोलणारे बाशिंदे आले. याच कालखंडात बुजुर्ग औलीया ‘तब्लिग’च्या प्रचार-प्रसारासाठी आले. त्यांनीही नागरिकांच्या दैनंदिन भाषेचा आधार घेत आपले म्हणणे नागरिकांसमोर ठेवले. यानंतर ‘बहामणी’ कालखंड पहायला मिळतो. साधारण १५० वर्षे हा कालखंड होता. या काळात उर्दूचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळाला. या भाषेला राजाश्रयही मिळाला. पुढे मुगल राज्यकर्ते जहांगीर, शहाजहान यांनी दक्कनवर अतिक्रमणे सुरू केली. १६०५ मध्ये मलीक अंबरच्या फतेहनगरला (औरंगाबाद) मुगलांनी फतेह केले. औरंगजेबला सुभेदार म्हणून नेमले. तब्बल ८ वर्षे औरंगजेब औरंगाबादेत राहिले. मुगल सैनिकांमुळे उर्दू भाषा अधिक गोड होत गेली. आणखी थोडे पुढे गेल्यावर १९४२ पासून उर्दूचा सुवर्णकाळ पहायला मिळतो. वली औरंगाबादी, सिराज औरंगाबादी असे मोठे शायर उदयाला आले. निझाम राजवटीने हैदराबादला राजधानी नेली. त्या काळात उर्दूला राजाश्रय मिळाला नाही. उस्मानिया विद्यापीठाचे इंटरमिजिएट महाविद्यालय मौलवी अब्दुल हक्क यांनी सुरू केले. त्यामुळे सिकंदर अली वज्द, हिमायत अली, जे. पी. सईद, काझी सलीम, बशर नवाज, सहेर जैदी अशी कितीतरी विश्वविख्यात मंडळी नावारूपाला आली. कोणत्याही भाषेला राजाश्रय मिळाल्याशिवाय ती मोठी होऊ शकत नाही, हे इतिहासावरून सिद्ध होते.