शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

स्वातंत्र्यपूर्व काळापासून उर्दूचा सुवर्णकाळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:03 IST

उर्दू साहित्यात मोठे योगदान असलेले आणि अनेक पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्त्व म्हणजे अस्लम मिर्झा. अदबच्या जगात अत्यंत आदराने त्यांचे नाव घेतले ...

उर्दू साहित्यात मोठे योगदान असलेले आणि अनेक पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्त्व म्हणजे अस्लम मिर्झा. अदबच्या जगात अत्यंत आदराने त्यांचे नाव घेतले जाते. ‘उर्दू साहित्यात औरंगाबादचे स्थान’या विषयावर त्यांनी ‘लोकमत’समोर मांडलेला इतिहास.

अस्लम मिर्झा- ज्येष्ठ साहित्यिक

औरंगाबाद : मराठवाड्यातील ‘दकनी’ उर्दू भाषेला ७०० वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. अनेक भाषांच्या मिश्रणातून ही गोड भाषा जन्माला आली. काही राज्यकर्त्यांनी उर्दूला राजभाषेचा दर्जा दिला तर काहींना दिला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून खरा सुवर्णकाळ पाहायला मिळतो. मोठमोठे लेखक, कवी, शायर १८ व्या शतकात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. औरंगाबाद शहर पूर्वीही उर्दूच्या चळवळीचा केंद्रबिंदू होते आणि आजही आहे.

मराठवाडा ज्याला इतिहासात आजही ‘दक्कन’ म्हटले जाते. सुफी, संत, राज्यकर्ते, व्यापारी अनेकांना हा परिसर खूपच आवडत होता. अलाऊद्दीन खिलजीने सर्वत्र आपली पाळेमुळे रोवायला सुरुवात केली. इ.स. १३०० च्या आसपासचा हा विषय. त्याच्यासोबत दिल्लीचे सैनिकही असत. मराठवाड्यात अरब व्यापाराच्या निमित्ताने, तर वेगवेगळ्या भाषा बोलणारे सैनिक येत. दैनंदिन व्यवहारात शब्दांचे आदानप्रदान होत होते. याच कालखंडात उर्दूने बारसे धरले. १३२७ मध्ये मोहमद तुघलकाने आपली राजधानी दौलताबाद येथे आणली. त्याच्यासोबत हजारो सैनिक आले. हरयानवी, पंजाबी, खडी बोली, बुंदेली, पारसी, तुर्की अशा कितीतरी भाषा बोलणारे बाशिंदे आले. याच कालखंडात बुजुर्ग औलीया ‘तब्लिग’च्या प्रचार-प्रसारासाठी आले. त्यांनीही नागरिकांच्या दैनंदिन भाषेचा आधार घेत आपले म्हणणे नागरिकांसमोर ठेवले. यानंतर ‘बहामणी’ कालखंड पहायला मिळतो. साधारण १५० वर्षे हा कालखंड होता. या काळात उर्दूचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळाला. या भाषेला राजाश्रयही मिळाला. पुढे मुगल राज्यकर्ते जहांगीर, शहाजहान यांनी दक्कनवर अतिक्रमणे सुरू केली. १६०५ मध्ये मलीक अंबरच्या फतेहनगरला (औरंगाबाद) मुगलांनी फतेह केले. औरंगजेबला सुभेदार म्हणून नेमले. तब्बल ८ वर्षे औरंगजेब औरंगाबादेत राहिले. मुगल सैनिकांमुळे उर्दू भाषा अधिक गोड होत गेली. आणखी थोडे पुढे गेल्यावर १९४२ पासून उर्दूचा सुवर्णकाळ पहायला मिळतो. वली औरंगाबादी, सिराज औरंगाबादी असे मोठे शायर उदयाला आले. निझाम राजवटीने हैदराबादला राजधानी नेली. त्या काळात उर्दूला राजाश्रय मिळाला नाही. उस्मानिया विद्यापीठाचे इंटरमिजिएट महाविद्यालय मौलवी अब्दुल हक्क यांनी सुरू केले. त्यामुळे सिकंदर अली वज्द, हिमायत अली, जे. पी. सईद, काझी सलीम, बशर नवाज, सहेर जैदी अशी कितीतरी विश्वविख्यात मंडळी नावारूपाला आली. कोणत्याही भाषेला राजाश्रय मिळाल्याशिवाय ती मोठी होऊ शकत नाही, हे इतिहासावरून सिद्ध होते.