शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

गोदावरी मनार, कलंबर कारखाना विक्रीला

By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST

रामेश्वर काकड, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गत अनेक वर्षापासून थकलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी जिल्ह्यातील गोदावरी मनार व कलंबर हे दोन सहकारी साखर कारखाने विक्रीला काढले आहेत.

रामेश्वर काकड, नांदेडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गत अनेक वर्षापासून थकलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी जिल्ह्यातील गोदावरी मनार व कलंबर हे दोन सहकारी साखर कारखाने विक्रीला काढले आहेत. यामुळे जिल्हा बँकेचे कर्ज थकविलेल्या इतर सर्वच सहकारी संस्थांचे धाबे दणाणले आहेत.अवसायनात असलेल्या शंकरनगर येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५४ कोटी ८६ लाख रुपये कर्ज थकले आहे. तर कलंबर येथील कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याकडे ४७ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे.सदर कारखान्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले परंतु त्यानंतर मात्र कर्जाची परतफेड केलीच नाही़ शेवटी कारखाने अवसानायात येवून बंद पडले. यानंतर जिल्हा बँकेने साखर कारखान्याकडील थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी बंद कारखाने कर्जापोटी विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी २०१३ या वर्षात बँकेचे एनपीएचे (अनुत्पादीत मालमत्ता) प्रमाण ३६.६१ टक्के होते. तर २०१४ या वर्षात एनपीएचे प्रमाण ३५.९२ टक्यावर आले आहे. एकूण थकलेल्या कर्जापैकी बिगरशेती एनपीएचे प्रमाण ९०.८१ टक्के तर शेतीकर्ज एनपीएचे प्रमाण ९.१९ टक्के आहे. ३१ मार्च २०१४ अखेरपर्यंत बँकेचे एकूण २०३ कोटी ६२ लाख ४१ हजार एवढे कर्ज येणे आहे. त्यापैकी बिगरशेती एनपीए १८४ कोटी ९१ लाख १४ हजार असून पैकी १४५ कोटी रुपये साखर कारखान्यांकडे थकले आहेत. यात गोदावरी मनार साखर कारखान्याकडे ५४ कोटी ८६ लाख तर कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याकडे ४७ कोटी १८ लाख थकले आहेत. कर्जाच्या वसुलीसाठी सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट २००२ अतंर्गत कारखान्याची मालमत्ता जप्त करुन मे.डोलेक्स इंडस्ट्रीज मुंबई यांना ६ वर्षासाठी भाडेतत्वावर चालविण्यास दिला होता. त्यातून ६१६.७९ लाख वसुली झाली. परंतु कारखाना अवसायानात आल्यामुळे उर्वरित थकीत रक्कम वसुल करण्यासाठी सेक्टुरिटायझेशन अ‍ॅक्ट २००२ अंतर्गत कारखाना विक्रीस काढला आहे. याशिवाय कलंबर कारखानाही अवसायनात आल्यामुळे विक्रीस काढला.२००५ मध्ये आर्थिक परिस्थिती खालावल्याने महाराष्ट्र सहसंस्था अधिनियमानुसार बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन १९ मार्च २००५ मध्ये बँकेवर प्रशासकाची नेमणूक केलेली आहे. परंतु येत्या महिनाभरात बँकेवर संचालक मंडळ निवडण्यात येणार आहे. संचालक मंडळाच्या कुटान्यामुळे अवसायानात आलेल्या मध्यवर्ती बँकेची प्रशासक नेमल्यानंतर प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. चालू अर्थिक वर्षात ठेवीत १८ कोटी १२ लाखांची वाढ झाली. तर आजघडीला बँकेकडे ३०२ कोटींच्या विविध स्वरुपाच्या ठेवी जमा आहेत. बँकेस २०१४ या वर्षात २ कोटी ९८ लाख ७६ हजार रुपयांचा नफा झाला आहे. गतवर्षी वैधानिक लेखा परीक्षण अहवालानुसार बँकेस क वर्ग दिला होता, परंतु चालू अर्थिक वर्षात लेखापरीक्षण अहवालानुसार बँकेस ब वर्ग प्राप्त झाला आहे. बँकेचे नक्तमुल्य २३ कोटी ३८ लाख ऐवढे झाले असून वसुलीचे प्रमाण ६८.९२ टक्यावरुन ६९.८० टक्यावर आले. यामुळे बँकेची अर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे.