शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
5
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
6
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
7
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
8
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
9
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
10
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
11
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
12
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
13
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
14
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
15
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
16
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
17
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
18
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
19
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
20
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी मनार, कलंबर कारखाना विक्रीला

By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST

रामेश्वर काकड, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गत अनेक वर्षापासून थकलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी जिल्ह्यातील गोदावरी मनार व कलंबर हे दोन सहकारी साखर कारखाने विक्रीला काढले आहेत.

रामेश्वर काकड, नांदेडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गत अनेक वर्षापासून थकलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी जिल्ह्यातील गोदावरी मनार व कलंबर हे दोन सहकारी साखर कारखाने विक्रीला काढले आहेत. यामुळे जिल्हा बँकेचे कर्ज थकविलेल्या इतर सर्वच सहकारी संस्थांचे धाबे दणाणले आहेत.अवसायनात असलेल्या शंकरनगर येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५४ कोटी ८६ लाख रुपये कर्ज थकले आहे. तर कलंबर येथील कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याकडे ४७ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे.सदर कारखान्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले परंतु त्यानंतर मात्र कर्जाची परतफेड केलीच नाही़ शेवटी कारखाने अवसानायात येवून बंद पडले. यानंतर जिल्हा बँकेने साखर कारखान्याकडील थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी बंद कारखाने कर्जापोटी विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी २०१३ या वर्षात बँकेचे एनपीएचे (अनुत्पादीत मालमत्ता) प्रमाण ३६.६१ टक्के होते. तर २०१४ या वर्षात एनपीएचे प्रमाण ३५.९२ टक्यावर आले आहे. एकूण थकलेल्या कर्जापैकी बिगरशेती एनपीएचे प्रमाण ९०.८१ टक्के तर शेतीकर्ज एनपीएचे प्रमाण ९.१९ टक्के आहे. ३१ मार्च २०१४ अखेरपर्यंत बँकेचे एकूण २०३ कोटी ६२ लाख ४१ हजार एवढे कर्ज येणे आहे. त्यापैकी बिगरशेती एनपीए १८४ कोटी ९१ लाख १४ हजार असून पैकी १४५ कोटी रुपये साखर कारखान्यांकडे थकले आहेत. यात गोदावरी मनार साखर कारखान्याकडे ५४ कोटी ८६ लाख तर कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याकडे ४७ कोटी १८ लाख थकले आहेत. कर्जाच्या वसुलीसाठी सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट २००२ अतंर्गत कारखान्याची मालमत्ता जप्त करुन मे.डोलेक्स इंडस्ट्रीज मुंबई यांना ६ वर्षासाठी भाडेतत्वावर चालविण्यास दिला होता. त्यातून ६१६.७९ लाख वसुली झाली. परंतु कारखाना अवसायानात आल्यामुळे उर्वरित थकीत रक्कम वसुल करण्यासाठी सेक्टुरिटायझेशन अ‍ॅक्ट २००२ अंतर्गत कारखाना विक्रीस काढला आहे. याशिवाय कलंबर कारखानाही अवसायनात आल्यामुळे विक्रीस काढला.२००५ मध्ये आर्थिक परिस्थिती खालावल्याने महाराष्ट्र सहसंस्था अधिनियमानुसार बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन १९ मार्च २००५ मध्ये बँकेवर प्रशासकाची नेमणूक केलेली आहे. परंतु येत्या महिनाभरात बँकेवर संचालक मंडळ निवडण्यात येणार आहे. संचालक मंडळाच्या कुटान्यामुळे अवसायानात आलेल्या मध्यवर्ती बँकेची प्रशासक नेमल्यानंतर प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. चालू अर्थिक वर्षात ठेवीत १८ कोटी १२ लाखांची वाढ झाली. तर आजघडीला बँकेकडे ३०२ कोटींच्या विविध स्वरुपाच्या ठेवी जमा आहेत. बँकेस २०१४ या वर्षात २ कोटी ९८ लाख ७६ हजार रुपयांचा नफा झाला आहे. गतवर्षी वैधानिक लेखा परीक्षण अहवालानुसार बँकेस क वर्ग दिला होता, परंतु चालू अर्थिक वर्षात लेखापरीक्षण अहवालानुसार बँकेस ब वर्ग प्राप्त झाला आहे. बँकेचे नक्तमुल्य २३ कोटी ३८ लाख ऐवढे झाले असून वसुलीचे प्रमाण ६८.९२ टक्यावरुन ६९.८० टक्यावर आले. यामुळे बँकेची अर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे.