शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीला महापूर, १७ गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 19:51 IST

.सकाळीच डोणगाव शिवारात येवून धडकलेल्या या पाण्याला तीव्र गती आहे . यामुळे गोदा पात्रालगतच्या वैजापूर तालुक्यातील सतरा गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ऑनलाईन लोकमत 

 
औरंगाबाद /वैजापुर : नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडलेले पाणी आज दुपारी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत धडकले.सकाळीच डोणगाव शिवारात येवून धडकलेल्या या पाण्याला तीव्र गती आहे . यामुळे गोदा पात्रालगतच्या वैजापूर तालुक्यातील सतरा गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
नदीतील पाण्याची ही गती कायम राहिल्यास रात्रीतून हे पाणी पैठणच्या नाथसागरात जावून पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान गोदावरी काठच्या गावातील ग्रामस्थांनी या पाण्याचे मोठ्या उत्साहात जलपूजन करून समाधान व्यक्त केले.
 
शुक्रवारी व शनिवारी नाशिक जिल्ह्यातील धरणक्षेत्रात वरुणराजा मनसोक्त बरसला. या दोन दिवसात नाशिकमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. दारणा धरणात ७६ टक्के इतका पाणीसाठा झाला होता.शनिवारी दुपारी  नांदूरमधमेश्वरमधून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले. त्यातच नाशिक परिसरातील कड़वा ( सिन्नर ), गंगापुर धरण व धारणा धरणातील पाणी नदीत दाखल होत होते. त्यामुळे गोदानदी पात्रात सायंकाळी ६१ हजार १३८ क्युसेकने पाणी धावत होते.
 
दरम्यान हे पाणी वैजापूर तालुक्यातील डोणगाव शिवारातील नदीपात्रात पहाटेच्या सुमारास येवून धडकले. ते पुढे बाबतारा, लाखगंगा, पुरणगाव पार करीत जायकवाडीकडे वेगाने झेपावत आहे. पाण्याची गती पाहता रात्रीतून हे पाणी जायकवाडीत पोहचेल. 
 
नाथसागरात सोमवारी धडकणार !
नदीतील पाण्याची गती वाढत असल्याने सोमवारी पहाटे हे पाणी पैठणच्या नाथसागरात जावून पोहोचेल असा अंदाज पाटबंधारे विभागा कडून व्यक्त केला जात आहे.
 
अनेक गावांचे संपर्क तुटले
पाण्याचा प्रवाह नदीपात्र ओसाडून वाहू लागल्याने.सावखेडगंगा व श्रीरामपूर तालुक्यातील नाऊरला जोडणाऱ्या शिऊर-श्रीरामपूर महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते.पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने डोणगाव,बाबतारा,लाखगंगा,बाभूळगावगंगा,भालगाव,नांदूरढोक या गावांना जोडणारे अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने त्यांचा
अन्य गावांशी संपर्क तुटला आहे
 
प्रशासन अलर्ट !
प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून.परिसरातील सर्व मंडळ अधिकारी,तलाटी व ग्रामसेवकाचे सुट्या रद्द करण्यात आले असून त्याना मुखयलायी राहन्याचे सुचना करण्यात आले असल्याचे तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.
 
या गावांना सतर्कतेचा इशारा !
तालुक्यातील गोदाकाठा वरील वांजरगाव,डाक पिपळगाव,डोंणगाव,पुरणगाव,बाबातारा,बाबूळगावगंगा,नांदुरढोक,सावखेडगंगा,भालगाव,नागमठान,चांदेगाव,बाजारठान,चेंडूफळ,अव्वलगाव व शनि दहेगांव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.