शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

गोदावरीला महापूर, १७ गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 19:51 IST

.सकाळीच डोणगाव शिवारात येवून धडकलेल्या या पाण्याला तीव्र गती आहे . यामुळे गोदा पात्रालगतच्या वैजापूर तालुक्यातील सतरा गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ऑनलाईन लोकमत 

 
औरंगाबाद /वैजापुर : नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडलेले पाणी आज दुपारी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत धडकले.सकाळीच डोणगाव शिवारात येवून धडकलेल्या या पाण्याला तीव्र गती आहे . यामुळे गोदा पात्रालगतच्या वैजापूर तालुक्यातील सतरा गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
नदीतील पाण्याची ही गती कायम राहिल्यास रात्रीतून हे पाणी पैठणच्या नाथसागरात जावून पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान गोदावरी काठच्या गावातील ग्रामस्थांनी या पाण्याचे मोठ्या उत्साहात जलपूजन करून समाधान व्यक्त केले.
 
शुक्रवारी व शनिवारी नाशिक जिल्ह्यातील धरणक्षेत्रात वरुणराजा मनसोक्त बरसला. या दोन दिवसात नाशिकमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. दारणा धरणात ७६ टक्के इतका पाणीसाठा झाला होता.शनिवारी दुपारी  नांदूरमधमेश्वरमधून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले. त्यातच नाशिक परिसरातील कड़वा ( सिन्नर ), गंगापुर धरण व धारणा धरणातील पाणी नदीत दाखल होत होते. त्यामुळे गोदानदी पात्रात सायंकाळी ६१ हजार १३८ क्युसेकने पाणी धावत होते.
 
दरम्यान हे पाणी वैजापूर तालुक्यातील डोणगाव शिवारातील नदीपात्रात पहाटेच्या सुमारास येवून धडकले. ते पुढे बाबतारा, लाखगंगा, पुरणगाव पार करीत जायकवाडीकडे वेगाने झेपावत आहे. पाण्याची गती पाहता रात्रीतून हे पाणी जायकवाडीत पोहचेल. 
 
नाथसागरात सोमवारी धडकणार !
नदीतील पाण्याची गती वाढत असल्याने सोमवारी पहाटे हे पाणी पैठणच्या नाथसागरात जावून पोहोचेल असा अंदाज पाटबंधारे विभागा कडून व्यक्त केला जात आहे.
 
अनेक गावांचे संपर्क तुटले
पाण्याचा प्रवाह नदीपात्र ओसाडून वाहू लागल्याने.सावखेडगंगा व श्रीरामपूर तालुक्यातील नाऊरला जोडणाऱ्या शिऊर-श्रीरामपूर महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते.पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने डोणगाव,बाबतारा,लाखगंगा,बाभूळगावगंगा,भालगाव,नांदूरढोक या गावांना जोडणारे अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने त्यांचा
अन्य गावांशी संपर्क तुटला आहे
 
प्रशासन अलर्ट !
प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून.परिसरातील सर्व मंडळ अधिकारी,तलाटी व ग्रामसेवकाचे सुट्या रद्द करण्यात आले असून त्याना मुखयलायी राहन्याचे सुचना करण्यात आले असल्याचे तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.
 
या गावांना सतर्कतेचा इशारा !
तालुक्यातील गोदाकाठा वरील वांजरगाव,डाक पिपळगाव,डोंणगाव,पुरणगाव,बाबातारा,बाबूळगावगंगा,नांदुरढोक,सावखेडगंगा,भालगाव,नागमठान,चांदेगाव,बाजारठान,चेंडूफळ,अव्वलगाव व शनि दहेगांव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.