शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

देव पावला... शांततेत कारवाई

By admin | Updated: May 30, 2014 01:00 IST

औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनाने आज पहाटे ३ वाजेपासून शहरातील विकास आराखड्याच्या रस्त्यांत येणारी अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ केला

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनाने आज पहाटे ३ वाजेपासून शहरातील विकास आराखड्याच्या रस्त्यांत येणारी अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ केला. अंगुरीबागचा अपवाद वगळता कुठेही गालबोट लागले नाही. शांतता आणि संयमाने धार्मिक स्थळे हटविण्यात आल्याने प्रशासनाला ‘देव’ पावला. रोशनगेट, आझाद चौक परिसरातील दोन धार्मिक स्थळे नागरिकांनी स्वत: काढली. पहिल्या दिवशीच्या कारवाईत १२ ठिकाणची धार्मिक स्थळे विधीवत काढून त्याचा मलबा लगोलग उचलून नेण्यात आला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत दोन पथकांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला सुरुवात झाली. १६ जानेवारी २०१२ पासून पाडापाडीचे सत्र सुरू झाले. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ते रुंद करण्याच्या मोहिमेत ही कारवाई सुरू केली होती. आयुक्त डॉ. कांबळे यांनी त्यांच्या दीड वर्षाच्या काळात प्रथमच एका संवेदनशील विषयाला हात घातला. अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन, उपायुक्त किशोर बोर्डे, शहर अभियंता एस. डी. पानझडे, पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया, पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात व मनपा, पोलीस, महसूल कर्मचार्‍यांचा ताफा पहाटेपासून या मोहिमेत सहभागी झाला होता. पोलिसांचा ताफा अगोदर, मनपाचा नंतर मध्यरात्री १.३० वाजेपासूनच पोलिसांनी शहर ताब्यात घेतले. ज्या ठिकाणची धार्मिक स्थळे काढायची आहेत, तेथील संबंधितांना पोलिसांनी पूर्वसूचना दिली होती. पहाटे ४ वाजेपर्यंत पोलिसांनी कडक बंदोबस्त लावल्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. ४ वाजेपर्यंत मनपाचे पथक झोपेतच होते. पोलीस आयुक्तांच्या दट्ट्यानंतर पालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. सकाळी ६ वाजेपर्यंत दोन पथकांची फौज दोन दिशेने निघाली. एकाच वेळी एमजीएम आणि गुलमंडी भागात कारवाई सुरू झाली. एक स्थळ पाडण्यासाठी अर्धा तास लागला. पोलीस व मनपाच्या अधिकार्‍यांनी परिस्थिती हाताळल्यामुळे तणाव निर्माण झाला नाही. आयुक्त म्हणाले... शहरातील नागरिकांंचे आभार मानून आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, रोशनगेट भागातील धार्मिक स्थळ रात्री १ वाजताच नागरिकांनी स्वत: काढले. कैलासनगर येथील मंदिरही नागरिकांनीच काढले. १२ स्थळे हटविली. त्यामध्ये लोकांचा सहभाग होता. मुद्दामहून कोणतेही स्थळ हटविले नाही. कैलासनगर येथून मोहिमेस प्रारंभ झाला. शनि मंदिर परिसर वगळता कुठेही तणाव झाला नाही. मनपाचे ५० हून अधिक अधिकारी व पोलिसांचा जम्बो बंदोबस्त होता. २५ मिनिटांत एक स्थळ हटविण्यास लागले. ज्या ठिकाणी कोर्ट स्टे आहे, त्याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी मनपा कोर्टात जाईल. रस्त्यावर पोलीसच पोलीस आज पहाटेच खाकी वर्दीवाल्यांचा बंदोबस्त पाहून औरंगाबादकरांच्या मनात भय निर्माण झाले. शहरात काही घडले की काय, अशी विचारणा अनेक नागरिकांनी केली. पोलिसांच्या नाकेबंदीमुळे गुलमंडी, कैलासनगर, पैठणगेट, विद्यापीठ ते मकईगेट रस्त्यांवर नागरिकांना ९ वाजेपर्यंत प्रवेश नव्हता. आता पुढे काय.? ४१ पैकी ७ धार्मिक स्थळांवर स्थगिती आहे. काल २७ रोजी दोन स्थळांवर स्थगिती आली असून, दोन्ही धार्मिक स्थळे छावणीच्या हद्दीत आहेत. आज १२ ठिकाणी कारवाई करण्यात आली. स्थगिती आलेल्या ९ आणि उर्वरित २० ठिकाणच्या धार्मिक स्थळांबाबत मनपा न्यायालयाचे मार्गदर्शन घेणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्याचे संकेत आहेत. या १२ ठिकाणी कारवाई या १२ ठिकाणी कारवाई विकास आराखड्यातील रस्ताहटविलेले धार्मिक स्थळ बाराभाई ताजिया ते पैठणगेटम्हसोबा मंदिर, आसरा मंदिर पानदरिबा ते अंगुरीबागअस्थाना पानदरिबा मशीद रोशनगेट ते आझाद चौक२ दर्गा, मजार लक्ष्मण चावडी ते एमजीएमतुळजाभवनी मंदिर, स्मशान हनुमान मंदिर छोटी भिंत, लक्ष्मीदेवी, आसरा मंदिर, दर्गा मकईगेट ते विद्यापीठ छोटे हनुमान मंदिर, दर्गा.