शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

ग्रंथदिंडी उत्साहात

By admin | Updated: July 26, 2014 00:39 IST

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शुक्रवारी शहरातील टाऊन हॉल मैदानापासून दयानंद महाविद्यालयातील संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली़साहित्य संमेलनाचे उद्घाटन दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी होणार आहे. दरम्यान, ग्रंथदिंडीचे उद्घाटन संस्कारवर्धिनीचे सचिव विजय दबडगावकर, साने गुरूजी शैक्षणिक संकुलाचे सचिव कालिदास माने, ज्ञानप्रकाश प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश नरहरे, संमेलनाचे निमंत्रक विकास पाटील, शरद कोरे, राजकुमार काळभोर, दशरथ यादव, ज्ञानेश्वर पतंगे, सतीश मडके, नयन राजमाने यांच्या उपस्थितीत करण्यात आले़ दिंडीची सुरूवात टाऊन हॉल येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली़ दिंडीत संस्कारवर्धिनी विद्यालय, साने गुरूजी शैक्षणिक संकुल, महात्मा फुले विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, गोदावरी कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा यासह शहरातील दहा शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीत सहभाग घेतला असून या दिंंडीचा समारोप दयानंद सभागृहातील संमेलनस्थळी करण्यात आला़ विद्यार्थी आणि नवोदित साहित्यिक ग्रंथदिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंबेडकर पार्क येथून दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहासमोर या ग्रंथदिंडीचा समारोप झाला. शनिवारी सकाळी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. (प्रतिनिधी)