शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा पालापाचोळा आम्हाला द्या, मातीविरहित शेतीला हातभार लावा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:04 IST

एन-२ परिसरात राहणाऱ्या मंजिरी यांनी पर्यावरणासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याविषयी सांगताना मंजिरी म्हणतात की, ज्यांच्या ...

एन-२ परिसरात राहणाऱ्या मंजिरी यांनी पर्यावरणासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याविषयी सांगताना मंजिरी म्हणतात की, ज्यांच्या अंगणात खूप झाडी असतात, त्यांच्याकडे रोजच खूप पालापाचोळा जमा होतो. बराच पालापाचोळा जमला की, तो सरळ पेटवून देण्यात येतो. यामुळे मग अत्यंत उपयुक्त असणाऱ्या पालापाचोळ्याची राख होते आणि दुसरे म्हणजे धुरामुळे पर्यावरणाची हानी होते. याशिवाय आपल्याच आजूबाजूला असे काही लोक असतात ज्यांना कंपोस्टिंगसाठी पालापाचोळा पाहिजे असतो. म्हणूनच ज्याला नको आहे, त्याच्याकडून पालापाचोळा घेऊन यायचा आणि गरजवंतांपर्यंत पोहोचवायचा, असा उपक्रम मंजिरी यांनी औरंगाबाद शहरात सुरू केला आहे.

औरंगाबादला स्थायिक होण्यापूर्वी मंजिरी पुणे, बेंगलोर, विजयवाडा अशा अनेक गावी कामानिमित्त वास्तव्यास होत्या. या ठिकाणीही त्यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला आहे. मातीविरहित शेती, कंपोस्टिंग या गोष्टींना प्रोत्साहन, पर्यावरणाचे संवर्धन आणि कचरा जाळण्याच्या समस्येला आवर घालण्याच्या उद्देशाने त्यांनी औरंगाबादला या उपक्रमाची सुरुवात केली आहे.

चौकट :

पालापाचोळ्याचे करा कंपोस्ट

बागेत एक खड्डा तयार करून त्यात पालापाचोळा, निर्माल्य जमा करीत जायचे. आठवड्यातून एकदा त्यावर बाजारात मिळणारे बायोएन्झाईम, गोमूत्र, शेणाचे पाणी किंवा आंबट ताक यापैकी काहीही एक शिंपडायचे. काही महिन्यांमध्ये त्यापासून उत्तम कंपोस्ट खत तयार होते. ज्यांच्याकडे मुबलक माती नाही, पण बाग फुलवायची आहे, असे लोक मातीऐवजी या कंपोस्टिंगचा उपयोग करून मातीविरहित बाग फुलवू शकतात, असे मंजिरी यांनी सांगितले.