शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

एकहाती सत्ता द्या, पुढचा काळ काँग्रेसचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:56 IST

काँग्रेसच्या कार्यकाळात शहरातील अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. येणाºया काळात उर्वरित विकासकामांना गती देण्यासाठी महापालिका निवणुकीत काँग्रेसला स्वबळावर सत्ता द्या, विकासाची गॅरंटी मी घेतो, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री तथा काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: काँग्रेसच्या कार्यकाळात शहरातील अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. येणाºया काळात उर्वरित विकासकामांना गती देण्यासाठी महापालिका निवणुकीत काँग्रेसला स्वबळावर सत्ता द्या, विकासाची गॅरंटी मी घेतो, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री तथा काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत दिली.प्रभाग क्रमांक ९ नवा मोंढा, दत्तनगर प्रभाग क्रमांक १० च्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ नंदीग्राम येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. अशोकराव चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, किशोर स्वामी, पूजा पवळे, मनमीतकौर गाडीवाले़, प्रशांत तिडके, नारायणसिंघ तबेलेवाले, या प्रभागाचे उमेदवार विरेंद्रसिंघ गाडीवाले, बापूराव गजभारे, अल्का शहाणे, जयश्री पवार यांची उपस्थिती होती़खा़ चव्हाण म्हणाले, काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात गुरु- त्ता- गद्दी तसेच जेएनएनयुआरएम योजनेत नांदेडचा समावेश झाल्याने अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. यामुळे शहरातील विविध विकास कामे करण्यात आली. यात नदीघाट परिसराचे सुशोभिकरण, अद्ययावत रुग्णालय, स्टेडियम, विमानतळ, उड्डाणपूल, शहरातील रस्त्यांची कामे करण्यात आली. त्यामुळे शहराचा कायापालट झाला आहे. अद्यापही शहर विकासाची काही कामे शिल्लक असून उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी महापालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत द्या, असे आवाहन त्यांनी केले.काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून योजना राबविल्या. प्रत्येक घटकाला न्याय व सर्वांचा विकास व्हावा असे धोरण काँग्रेसच्या कार्यकाळात घेण्यात आले होते. मात्र भाजप सरकारने जनतेला केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेल्या एकाही आश्वासनाची भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्तता केली नाही. महापालिका निवडणुकीत भाजपा आता मत मागत आहेत. या भारतीय जनता पक्षाचे विकासासाठी काय योगदान आहे? भाजपा सरकारच्या तीन ते साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात नांदेडच्या विकासासाठी किती निधी दिला? असा सवाल खा. अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित केला. शहरातील जनता आता भाजपाच्या थापाला बळी पडणार नाही. असा विश्वास व्यक्त करत नांदेडचा विकास आणखी गतीने करणार आहोत असेही ते म्हणाले़ यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांनी जनतेचा कल पुन्हा काँग्रेसकडे असल्याचे सांगत हा संदेश दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी महानगरपालिकेवर काँग्रेसला बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.